Balasaheb Patil, Abdul Sattar
Balasaheb Patil, Abdul Sattar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Abdul Sattar Controversy : सत्तारांना राजकारणातुन बाजुला करा...बाळासाहेब पाटील

हेमंत पवार

कऱ्हाड : राज्यात अलिकडे सत्तेत आलेल्यांच्या डोक्यावर 50 खोक्यांचा विषय चिकटून बसलेला आहे. तो कलंकही पुसता येत नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त मानसिकतेतून चिडून अब्दुल सत्तार यांच्यासारखी मंडळी अशी संतापजनक वक्तव्य करत आहेत. अशा प्रकारचे राजकारणी महाराष्ट्राच्या भल्याच्या दृष्टीने राजकारणात राहणे योग्य नाही. त्यांच्या पक्षातील वरिष्ठांनी त्यांना राजकारणातून बाजूला करावे, अशी मागणीही माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या संतापजनक वक्तव्याचा आमदार पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आमदार पाटील म्हणाले, महाराष्ट्राला उच्च सांस्कृतीक परंपरा आहे. महाराष्ट्र हे महिलांचा आदर करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे जाणारे जेष्ठ नेते (कै) यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे.

या राज्यात अलीकडे राजकीय परिस्थिती बदलून ज्या मार्गाने ही मंडळी सत्तेत आली तो मार्ग महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही. या मंडळींच्या डोक्यावर 50 खोक्यांचा विषय चिकटून बसलेला आहे, तो काही केल्या निघत नाही. कोणतेही काम त्यांना दाखवता येत नाही. डोक्यावर बसलेला कलंकही पुसता येत नाही.

त्यांनी तो कलंक मान्यच केला आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त मानसिकतेतून चिडून अब्दुल सत्तार यांच्यासारखी मंडळी अशी संतापजनक वक्तव्य करत आहेत. अशा प्रकारचे राजकारणी महाराष्ट्राच्या भल्याच्या दृष्टीने राजकारणात राहणे योग्य नाही. त्यांच्या पक्षातील वरिष्ठांनी त्यांना राजकारणातून बाजूला करावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT