Kolhapur Flood Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Video Kolhapur Flood: मुख्यमंत्रीसाहेब, गळफास लावून घेण्याचा आमचा विचार थांबवा! शेतकऱ्यांची आर्त हाक

Rahul Gadkar

Kolhapur News : गेली पंधरा दिवस कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा विळखा पडला होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातला पूर हळूहळू ओसरू लागला असला तरी शिरोळ तालुक्यातील पंचगगा आणि कृष्णा नदीमुळे मात्र पूरस्थिती कायम आहे.

या तालुक्यातील संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. त्यामुळे वर्षा वर्षाला पूर येत असल्याने थेट शेतकऱ्यांनी आता राज्यसरकारला आर्त हाक देत कवितेतून मागणी केली आहे. थेट मुख्यमंत्र्यंनाच साकडे घातले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातून वाहत जाणारे पाणी शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या फुगवठ्यामुळे पुराची स्थिती गंभीर होते. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पुरेसा पाण्याचा विसर्ग होत नसल्याने शिरोळ तालुक्यातील शेतीला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसत आहे.

शेती दरवर्षी पाण्याखाली जात असल्याने, शेतकऱ्याने थेट आपली भावना मांडली आहे. आम्हाला सरकारी अनुदान नको, पण या पुराचा कायमचा बंदोबस्त करा,अशी विनंती शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या आसवांचा बांध ही फुटला आहे.

दरवर्षी पूर येणार, मदत करणार, दरवर्षी लाचार करणार का? हा महापूर कसा रोखता येईल याकडे लक्ष द्या, अशी मागणी करत आम्ही गळफास लावून घेणार असा आमचा विचार आहे तो थांबवा. आसवांचा बांध आमचा रोखा, अशी आर्त हाक शेतकऱ्याने मुख्यमंत्री शिंदे यांना दिली आहे.

आठ दिवस पाऊस पडल्यावर इतका महापूर येत असेल तर पंधरा दिवस पाऊस पडल्यावर काय होईल याचा विचार करा. तुमची मदत नको पण येणारा महापूर रोखा, अशी मागणी शेतकऱ्याने व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT