shendur  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : 'तंटामुक्ती'च्या अध्यक्षपदावरून तंटा 

Rahul Gadkar

Kagal News : कागल तालुक्यातील शेंडूर येथे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष निवडीवरून वाद सुरु आहे.त्यामुळे काही ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे तक्रार केली आहे. तंटामुक्ती समिती अध्यक्षपदावरून सुरु असलेला येथील 'तंटा' तालुक्यात जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे.

तीन वर्षापासून रिक्त असलेले येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष निवडीसाठी तीस ऑगस्टला शेंडूरच्या  ग्रामसभेत  विषय ठेवण्यात आला होता. मात्र कोरमअभावी ही ग्रामसभा तहकूब केली. त्यानंतर या ठिकाणी कार्यरत असलेले ग्रामसेवक दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले. प्रभारी ग्रामसेवक हजर झाल्यानंतर ही तहकूब ग्रामसभा आठ डिसेंबर रोजी झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी अध्यक्षपदासाठी इच्छुक तीन जणांपैकी एकाने माघार घेतली. उर्वरित दोघांपैकी एका नावावर निर्णय न झाल्याने मतदान घेण्याचे ठरले. त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन घेऊन पंधरा डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येईल.असे ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर केले. दरम्यान चौदा डिसेंबर रोजी सरपंच अमर कांबळे यांनी या विषयावरून गावात तणावाचे वातावरण असल्यामुळे हा विषय स्थगित करत असल्याचे जाहीर केले.

दरम्यान शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायतीने आधी जाहीर केल्याप्रमाणे काही ग्रामस्थ गाव सभेसाठीच्या विठ्ठल मंदिर या ठिकाणी उपस्थित झाले. मात्र सभाध्यक्ष तथा सरपंच यांनी हा विषय स्थगित करत असल्याचे जाहीर केल्यामुळे ग्रामपंचायतच्यावतीने कोणीही या ठिकाणी उपस्थित राहिले नाही. त्यानंतर अध्यक्षपदासाठीचे उमेदवार सचिन ढवण यांनी पंचायत समितीकडे काही ग्रामस्थांसह धाव घेऊन याबाबत तक्रार केली.  

सचिन ढवण यांनी सांगितले , सरपंच अमर कांबळे तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीची प्रक्रिया शासनाच्या निर्देशाप्रमाणे राबवित नाहीत. या पदासाठी इच्छुक दुसऱ्या उमेदवाराने या निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला त्यांचा नॉन क्रिमिलियर दाखला वेळेत दाखल केलेला नाही. त्यामुळे केवळ माझाच अर्ज वैध ठरल्याने अध्यक्षपदी निवड जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र गावात शांततेचे वातावरण असूनही ते अशांत असल्याच्या करण देऊन ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने स्थगित ठेवली आहे. याविरोधात आमचा लढा सुरू राहील.

याबाबत प्रतिक्रिया देताना सरपंच अमर कांबळे म्हणाले, ग्रामपंचायतीकडून ही प्रक्रिया पारदर्शकपणे घेण्यात येत आहे. मात्र काही नागरिक दिशाभूल करून गावामध्ये अशांतता पसरवित आहेत. त्यामुळे पूर्व काळजी म्हणून ही निवड प्रक्रिया स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार लवकरच ती पूर्ण करू.

(Edited By -Sudesh Mitkar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT