Satej Patil addressing media on the shortcomings in Devendra Fadnavis’ governance and offering suggestions for better administration.  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil on Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस नेमकं कुठं चुकतात? सतेज पाटलांचे निरीक्षण अन् सल्लाही...

Where Satej Patil Sees Errors in Devendra Fadnavis' Leadership : देवेंद्र फडणवीस यांचा लोकांसोबतचा टच कमी पडतोय, असे निरीक्षण सतेज पाटील यांनी नोंदवले आहे. लोक भावनेतून जे मुद्दे समोर येतात ते सोडवण्याचे प्रयत्न कमी पडत असल्याचेही ते म्हणाले आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur Politics : विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात असले तरी निवडून आल्यानंतर आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री हे एका पक्षाचे नसतात. ते सर्वांचेच असले पाहिजे, अशी भूमिका सर्वच जण व्यक्त करत असतात. पण विरोधकांनाही या पदाकडून तितकीच अपेक्षा असते. या सर्व गोष्टींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करत असताना नेमकं काय जाणवलं? वा काय अभ्यासलं? याचं निरीक्षण सतेज पाटील यांनी केले आहे.

सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वांना सोबत घेऊनच काम करण्याचा मैत्रीचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कसे वाटतात? उपमुख्यमंत्री अजितदादांचा निर्णय फायदेशीर ठरेल का? महायुतीत सर्व काही ठीक आहे का? उद्धव ठाकरेंबाबत काय सांगाल? या सर्व प्रश्नावर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे.

सतेज पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना म्हणतात, महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून त्यांना लवकर संधी मिळाली. परंतु लोकांसोबत त्याचा टच कमी पडतोय. लोक भावनेतून जे मुद्दे समोर येतात ते सोडवण्याचे प्रयत्न कमी पडतात. मराठा आरक्षणावरून लोक विरोधात गेले. मराठवाडामध्ये भाजपच्या लोकांनी सभा घेतल्या नाहीत. याचे आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे. मिळालेल्या संधीतून आपण महाराष्ट्रासाठी काय करतोय? लोकांच्या भावनांचा विचार करतोय का? हे अभ्यासले पाहिजे.

सर्वांना पुढे घेऊन जाण्याची त्यांची जबाबदारी आहे. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा निर्णय फायदेशीर ठरेल असं मला वाटत नाही. कारण उद्याच्या निवडणुका ह्या स्वतंत्र होतील. महायुतीतील संजय शिरसाट संजय गायकवाड यांच्याबाबत या अधिवेशनात काय झालं? हे जनतेने पाहिले. तीन पक्षांमधील अंतर्गत जे वातावरण आहे ते व्यवस्थित नाही. त्यांचे एकत्र येणे नैसर्गिक नाही तर गरज म्हणून एकत्र आलेले आहेत.

भाजपला स्वतःचे अस्तित्व तयार करायचे आहे, स्वतःची सत्ता हवी आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं वातावरण तयार केले जात आहे, असेही पाटील म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भावनिक आहेत. राजकारणात ते चतुर आहेत. पक्ष संघटनेसाठी ते अधिक वेळ देतात. ही त्यांच्या जमेची बाजू आहे. शाखाप्रमुखाला महत्त्व देतात, असे कौतुक सतेज पाटील यांनी उद्धव ठाकरेंचे केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT