Kolhapur News : मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाल्यानंतर कोणत्याही क्षणी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. कोल्हापूर जिल्ह्यात कोणाला मंत्रीपद मिळणार याकडे असंख्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यात महायुतीच्या दहाही जागा निवडून आल्यानंतर महायुतीत (Mahayuti) भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री पदावरून आमदारांमध्ये रस्सीखेच निर्माण झाली आहे.
प्रत्येकजण आपापल्या परीने फिल्डिंग लावत असताना मंत्रीपद निश्चित झाल्यानंतर पालकमंत्री आपल्याकडेच घ्यायचं यासाठी आतापासूनच जोडण्या लावायला सुरुवात केली आहे. विधानसभेचा निकालानंतर महायुतीतील आमदारांनी मुंबईतच तळ ठोकला आहे. काहीतरी पदरात पाडून घेण्याच्या उद्देशानेच वरिष्ठ नेत्यांना गळ घातला जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून एक मंत्रीपद निश्चित समजले जाते. आमदार हसन मुश्रीफ यांचा पूर्वानुभव पाहता सलग बावीस वर्ष ते मंत्रीपदावर आहेत. तर आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्यासह शिवसेनेने चार आमदार जिल्ह्यात दिले आहेत. तर चंदगडचे अपक्ष आमदार यांच्यासहित भाजपचे तीन आणि जनसुराज्यचे आमदार कोल्हापूर जिल्ह्यात आहेत.
त्यामुळे मंत्रीपदावरून भाजप-जनसुराज्य,शिवसेनेतील आमदारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. मंत्री पदासाठी दावेदारी करत मुंबईत लॉबीग सुरू केले आहे. 11 डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. पण त्यानंतर पालकमंत्री पदासाठी देखील फिल्डिंग लावली जात आहे.
पालकमंत्री पदासाठी मुश्रीफ यांचा पूर्वानुभव आहे. मात्र महाविकास आघाडीकडून कागल पुरतेच पालकमंत्री मर्यादित आहेत. अशी टीका त्यांच्यावर होत आली आहे. तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे असलेली मैत्री ही महाविकास आघाडीसाठी पूरक असल्याची तक्रार खासगीत वरिष्ठ नेत्यांना दिली आहे. शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत येतील मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सर मुश्रीफ यांची पालकमंत्री त्यावर वर्णी होणार का हे पाहावे लागणार आहे.
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून देखील पालकमंत्री पदासाठी फिल्डिंग लावली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडे अनेक इच्छुकांचा ओढा आहे. त्यामुळे क्षीरसागर यांनी देखील जोर लावला आहे. तर राधानगरी विधानसभा मतदारसंघातून हॅट्ट्रिक केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आबिटकर यांना आमदार करा, मी नामदार करून पाठवतो. ते आवाहन केल्यानंतर अबिटकर यांचे मंत्रीपद निश्चित समजले जात आहे.
शहर स्तरावर क्षीरसागर यांची ताकद अधिक आहे. तर ग्रामीण भागातील तीन ते चार तालुक्यावर अबिटकर यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे ते देखील पालकमंत्री पदाचे दावेदार आहेत. या तिघांकडून ही पालकमंत्री पदासाठी मोठी मोर्चेबांधणी केली जात आहे. तर जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे हे देखील पालकमंत्री पदाच्या रेसमध्ये असू शकतात. तर कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील हे देखील कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याच्या चर्चा आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.