मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.
आंदोलनासाठी मराठवाड्यातून लाखो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत.
सरकारने फक्त एका दिवसाची परवानगी दिल्याने जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Narayangaon News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे मुंबईतील आझाद मैदानाकडे निघाले आहेत. तेथे शुक्रवारी (ता.29) आंदोलन करणार आहे. आंदोलनासाठी मराठवाड्यातून लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्या या आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. यावरून जरांगे पाटलांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सरकारला परवानगी देण्याचे अधिकार असतानाही तसे झाले नाही. फक्त एक दिवसाची परवानगी दिली आहे. हे मराठ्यांची चेष्टा असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते मुंबईकडे निघाले असून त्यांच्या बरोबर हजारोंचा जनसमुदाय चालत आहे. अशातच त्यांना आधी मुंबई उच्च न्यालालयाने आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही असा आदेश दिला. यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्यांना अटी व शर्तींवर एक दिवसाच्या आंदोलनास परवानगी दिली आहे. मात्र ते बेमुदत आंदोलनावर ठाम आहेत. सध्यातरी त्यांनी पोलिसांच्या अटी व शर्तींवर आंदोलन करण्यासाठी तयारी दाखवली आहे. पण मुंबईकडे येत असतानाच त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
जरांगे पाटील यांनी सरकारच्या अखत्यारीत सगळ्या गोष्टी असतानाही त्या टाळल्या जात आहेत. परवानगी देतानाही फक्त एक दिवसांची परवानगी दिलीय. ही मराठ्यांची चेष्टाच आहे. त्यामुळे आतातरी समाजाचे शहाणे व्हावे. यांच्या मागे जाऊन आजपर्यंत काय मिळवले याचाही विचार करावा.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना आपण कोणाचेही आरक्षण काढून न घेता मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला आहे. दुसऱ्या कोणत्याच सरकारने यावर काम केलं नाही. तरीही लोकशाहीत सर्वांना आंदोलन करण्याचा आधिकार आहे. जर जरांगे लोकशाहीने मागण्या मांडत असतील त्या सोडवल्या जातील असे म्हटले होते.
त्यांच्या या वक्तव्यावर जरांगे यांनी, आताही बघू ते कोणता दावा करतात. आतापर्यंत त्यांनी केलेल्या दाव्याचे दुष्परिनाम समोर आले आहेत. आता फक्त नारायणगावात लाखो लोक एकवटले आहेत. आता पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भासहीत मुंबईही यात उतरत आहे. त्यामुळे अजून वेळ गेलेली नाही.
सध्या सरकारने काही मर्यादा घातली असली तरीही पुन्हा विचार करावा. तर जोपर्यंत सगळ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण करण्यावर ठाम आहे. तसेच आता 5 हजारांची मर्यादा दिली आहे. पण लोक जास्त जमले म्हणून लाठी काठी उगारू नका. मराठ्यांना त्रास देवू नका, अशी मागणी केली आहे.
यादरम्यान ओबीसी नेत्यांचीही बैठक पार पडली असून त्यांनी देखील मुंबईकडे कूच करू असा इशारा दिला आहे. त्यावर जरांगे यांना प्रतिक्रिया विचारली असता. त्यांनी दोनच वाक्यात हा विषय संपवला. ते म्हणाले, आमचा त्यांना विरोध नसून त्यांच्याशी काही घेणं- देणं नाहीय. आम्ही आमच्या हक्कासाठी लढा देत आहोत. आम्ही त्यांना विरोध करत नाही. त्यांना जो काही विरोध करायचा तो करू द्या.
प्र.१. मनोज जरांगे पाटील आंदोलन कुठे करणार आहेत?
उ. मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन होणार आहे.
प्र.२. आंदोलनासाठी सरकारने किती परवानगी दिली आहे?
उ. फक्त एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे.
प्र.३. जरांगे यांनी सरकारवर कोणता आरोप केला आहे?
उ. मराठा समाजाची चेष्टा केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.