Vishal Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Patil : 'महाराष्ट्रातलं सरकार जाती-जातींमध्ये भांडणं लावतंय'; संसदेत विशाल पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

Vishal Patil On BJP : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. सरकार आल्यापासून काही ठिकाणी जातीय तेढ निर्माण झाले आहे. यावरून खासदार विशाल पाटील यांनी संसदेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Aslam Shanedivan

Sangli News : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. सरकार आल्यापासून भाजपचे कार्यकर्ते तसेच त्यांचे काही मंत्री थेट जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होतील असे वक्तव्य करत असल्याचे राज्याचे सामाजिक वातावरण गढूळ होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. यावरून खासदार विशाल पाटील यांनी भाजपवर संसदेत हल्लाबोल केला आहे. ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत होते.

यावेळी विशाल पाटील यांनी राज्यातील भाजप सरकार जाती-जातींमध्ये भांडण लावत असून त्यातून सत्ता मिळवण्याचा फायदा उचलत आहे. मराठा आरक्षणाच्या लढाईला या सरकारने मराठा विरुद्ध ओबीसी लढ्याचे रूप दिल्याचा दावा विशाल पाटील यांनी केला आहे.

महाराष्ट्र हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराने चालतो, मात्र इथे जाती-जातींत भिंती उभ्या करण्याचे काम सुरू आहे. जाती-जातीत लढाई होत राहिली पाहिजे, असे भाजप सरकारचे धोरण असल्याची टीका विशाल पाटील यांनी केली आहे.

महाराष्ट्रात भाजप सरकारने मराठा आरक्षणाच्या लढाईला मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग दिला. धनगर समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मागतोय. त्यासाठी लढतोय. त्या लढ्याला धनगर विरुद्ध अनुसूचित जमाती (एसटी) असा रंग देण्यात आला. जैन समाजातील दिगंबर आणि श्वेतांबर पोटजातींमध्ये तणावाचे वातावरण आहे.

वाशीम जिल्ह्यातील शिरपूर येथील एका जैन मंदिरात पूजेच्या अधिकारावरून मारहाण होते. दिगंबर समाज पूजा करायला गेल्यानंतर तेथे मारहाण केली जाते. या दोन पोटजातींमध्ये तोडगा काढायचा प्रयत्न सरकार करताना दिसत नाही. समाज भांडत राहिला पाहिजे, त्यातून आपण जिंकत राहिलो पाहिजे, असे सरकारला वाटते का? असा सवाल देखील विशाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. ओबीसींचा धर्माशी संबंध काय होता, मात्र ते त्याच पद्धतीचे राजकारण करू पाहतात.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना, विशाल पाटील म्हणाले की, राष्ट्रपतींचे अभिभाषण हे दिल्ली आणि बिहारच्या निवडणुकीसाठीचा जाहीरनामा वाटला. अर्ध्याहून अधिक जनता आत्मनिर्भर नाही. ती सरकारच्या जनकल्याण योजनांवर अवलंबून आहे. ही कसली आलीय आत्मनिर्भरता? तुम्हाला गरिबी हटवायची आहे की गरिबांनी सरकारच्या योजनांवर अवलंबून राहावे, असेच सरकारला अपेक्षित आहे? हा स्वप्नांचा भारत नाही, हा संघर्षाचा आहे. महागाई, बेरोजगारी, गरिबीच्या ओझ्याखाली जनता दबली आहे. सरकार जुमल्याची गुट्टी पाजण्यात व्यस्त आहे. जाहिरातींचे सरकार नकोय, कामाचे सरकार हवे आहे.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT