भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात खासदार विशाल पाटील यांनीही सहभाग घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
या आंदोलनामुळे सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
Sangli News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून सांगलीसह राज्यभरातील राजकीय वातावरण तापलं आहे. अशात पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध आणि जयंत पाटील यांना पाठिंबा म्हणून सोमवारी (ता. 22) सांगलीमध्ये महाविकास आघाडीचा महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार निलेश लंके, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी खासदार विशाल पाटील यांची देखील उपस्थिती होती. यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधान करताना, जयंत पाटील हा बिनडोक माणूस असून त्याला काही अक्कल नाही. जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद आहेत, असे वाटत नाही अशा शब्दात टीका केली होती. या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. शरद पवार आणि त्यांचा पक्ष चांगलीच आक्रमक झाला असून पडळकरांचा निषेध व्यक्त केला जात आहे. स्वतः शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून त्यांच्याकडे तक्रार केली.
त्यानंतर पडळकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ येथील कर्मवीर चौकात महाविकास आघाडीचा महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार विशाल पाटील यांनी देखील उपस्थिती लावत पडळकर यांच्या विधानाचा निषेध केला. त्यांच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्या कुटुंबांमध्ये गेल्या 60 वर्षांपासून हाडवैर आहे. दिवंगत वसंतदादा पाटील आणि दिवंगत राजारामबापू पाटील यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण जिल्ह्याने बघितले.
हाच वाद पुढेही चालू राहिला. वसंतदादा पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या घराण्याला उतरती कळा लागली. जयंत पाटील यांनी यात महत्वाची कामगिरी बजावली. गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही याच वादाचा फटका विशाल पाटील यांना बसला. त्यामुळे हे वितुष्ट आणखी वाढले. मात्र मतचोरी असो किंवा आता झालेले वादग्रस्त वक्तव्य असो विशाल पाटील हे जयंत पाटलांच्या बाजूने उभे असल्याचे दिसत आहे.
याआधी जतमधील वोट चोरीच्या मुद्द्यावरून आमदार जयंत पाटील आणि पडळकर यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलं होतं. त्यावेळीही विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांच्या मतचोरीचा मुद्दा धरत पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला होता. जत विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार हरला नाही, तो मतचोरीनं हरवल्याचा आरोप केला आहे. विशाल पाटील यांनी वसंतदादा पाटील यांच्यावरूनही पडळकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याच्या विकासामध्ये वसंतदादा पाटील यांचं काय योगदान आहे याचं सर्टीफिकेट गोपीचंद पडळकर यांच्याकडून घेण्याची गरज नसल्याचे विशाल पाटील यांनी म्हटलं आहे.
1. महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा का काढण्यात आला?
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे.
2. मोर्चा कुठे काढण्यात आला?
सांगलीत.
3. मोर्चात कोण सहभागी झाले होते?
खासदार विशाल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक.
4. या मोर्चामुळे काय परिणाम झाला?
सांगलीत राजकीय वातावरण तापले आणि मोठी चर्चा सुरू झाली.
5. गोपीचंद पडळकर कोणत्या पक्षाचे आमदार आहेत?
ते भाजपचे आमदार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.