Dilip Walse Patil
Dilip Walse Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज्यात लवकरच ७२०० पोलिसांची भरती : वळसे-पाटील

सरकारनामा ब्यूरो

अहमदनगर : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस भरतीबाबत महत्वाची घोषणा केली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ७२०० पोलिसांची (police) भरतीची प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू केली जाणार असल्याचे वळसे-पाटलांनी (dilip walse patil) सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

''राज्यात पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली आलेली ५७०० पोलिसांची भरतीची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. याबरोबरच राज्यातील पोलीस ठाण्यांच्या अत्याधुनिकीकरणासाठी राज्य सरकारकडे निधी मागितला जाणार असल्याची माहिती दिलीप वळसे यांनी दिली. अहमदनगर येथे जिल्हा पोलीस दलाची आढावा बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.

आमदार संग्राम जगताप, नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह पोलीस अधिकारी व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी यांच्या हस्ते ‘ई-टपाल’ सेवासुविधा, स्वागत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यात मार्चनंतर मोठ्या प्रमाणावर पोलिसांसाठी घरे उभारणीचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. पोलीस ठाण्यांच्या अत्याधुनिकीकरणासंदर्भात आपल्याकडे माहिती संकलित झाली आहे. त्यानुसार राज्य सरकारकडे निधी मागितला जाणार आहे.

नगर जिल्ह्यात एकापेक्षा अनेक गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती टु प्लस योजनेव्दारे संकलीत केली जात आहे. अनेक प्रलंबित गुन्ह्याचा निपटारा केला जात असल्याचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT