sadabhau Khot & Uddhav Thackeray
sadabhau Khot & Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक वेळी बिळात जाऊन बसतात

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब (CM Uddhav Thhackeray) आता तरी जरा आपल्या महालातून बाहेर या आणि जनतेचे काय प्रश्न आहेत ते जाणून घ्या. कोरोना (Covid-19) आला मास्क लावा, घरात बसा आणि पळ काढा. याला वाघ म्हणत नाहीत. वाघ हा डरकाळ्या फोडत जात असतो. आणि तुमच्यात वाघाचे एकही लक्षण नाही. प्रत्येक वेळी तुम्ही बिळात जाऊन बसता. आम्ही खरा वाघ बघायला अधिवेशनामध्ये येणार आहे, असे थेट आव्हान व टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर केली आहे. ते सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे बोलत होते.

खोत म्हणाले, शेतकरी, शेतमजूर आणि बाला बलुतेदार यांचे अनेक प्रश्न राज्यात आहेत. त्यामुळे हे अधिवेशन पूर्ण झाले पाहिजे. मात्र, हे राज्य सरकार अधिवेशना पासून सातत्याने पळ काढत आहे. देश्याचे अधिवेशन महिनाभर चालते आणि राज्य सरकारचे पाचच दिवस का चालते, असा सवाल त्यांनी उपस्थित करत अधिवेशन घेतल्यावर आपला भ्रष्टाचार बाहेर पडेल याची भीती सरकारला वाटत आहे. यामुळे ते अधिवेशन घेत नाहीत, असा जोरदार हल्लाबोल राज्य सराकारवर त्यांनी केला.

राज्य सरकारने जर अधिवेशन घेतले तर, अनेक मंत्र्यांना मंत्रीमंडळातून बाहेर जावे लागेल. याच भीतीपोटी ठाकरे सरकार कोरोनाची भीती दाखवत अधिवेशन घेत नसल्याची टीका खोत यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT