Sangli News, 29 Jul : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने आज स्थगिती दिली. यामुळे संचालकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयावर अवलंबून असणाऱ्या आमदार जयंत पाटील यांची तूर्तास आघाडी ही चर्चेत आली आहे.
मंगळवारी सभापती आनंदराव नलवडे यांनी पुन्हा पदभार घेतला. खंडपीठाच्या दिलासामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या आमदार जयंत पाटील यांच्या गटाने पहिली लढाई जिंकल्याने राजकीय वर्तुळात भाजपच्या मनसुब्यांना धक्का मिळाला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेबरोबर सांगली बाजार समितीची न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर आता मिरज पंचायत समिती सभापतीपदाची न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.
सांगली बाजार समितीचा त्रिभाजनाचा निर्णय झाल्यानंतर महाविकास आघाडीतील खासदार विशाल पाटील आमदार जयंत पाटील, माजी आमदार विक्रम सिंह सावंत यांना मोठा राजकीय धक्का बसला होता. त्रिभाजनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका कोल्हापूर सर्किट बेंच येथे दाखल केल्यानंतर साडेतीन महिन्याच्या सुनावणीनंतर त्रिभाजनाच्या आदेशाला स्थगिती दिली. स्थगिती देत असताना ग्रामपंचायती आणि सोसायटी यांच्या हरकतीचा विचार करून निर्णय घेण्याच्या सूचना देखील सर्किट बेंचने दिले आहेत.
त्रिभाजनाचा निर्णय झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी बाजार समितीवर राजकीय दृष्ट्या वर्चस्व मिळवले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चेमुळे काही अंशी यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेण्याच्या हालचाली भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांकडून सुरू होत्या. मला देखील धक्का बसला आहे.
दरम्यान कोल्हापूर सर्किट मंचेकडून त्रिभाजनाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर महाविकास आघाडीने पुन्हा एकदा मैदानात बाजी मारली आहे. न्यायालयाचा या निर्णयामुळे केवळ बाजार समिती पुरतेच नव्हे तर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील प्रमुख संस्थांवरील लढाई दोन्ही गटाच्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. आमदार जयंत पाटील यांनी केलेली कमबॅक ची लढाई ही महत्वपूर्ण ठरली आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेबरोबर बाजार समितीतील लढाई जिंकल्याने जयंत पाटील यांचा विश्वास आणखीन वाढला आहे. त्यामुळे तिसरी लढाई ही मिरज पंचायत समिती सभापती पदासाठी असणार आहे हे नक्की आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार पूर्वीच्या संचालक मंडळांना कार्यभार करण्यासाठी मुभा दिल्याने तूर्तास तरी भाजपचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.
राज्य शासनाने शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरावर स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील ६८ तालुक्यांमध्ये नवीन बाजार समित्यांच्या योजनेत सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचाही समावेश होता. त्यानुसार ६ एप्रिल रोजी शासनाने सांगली, जत आणि कवठेमहांकाळ अशा तीन स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना जाहीर केली.
त्यानंतर विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आणि सांगली येथे जिल्हा उपनिबंधक, तर जत व कवठेमहांकाळ येथे तालुका उपनिबंधकांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. याविरोधात विद्यमान संचालक मंडळ, शेतकरी संघटना, ग्रामपंचायती आणि विविध विकास सोसायट्यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली. संचालकांचा अद्याप दोन वर्षांचा कार्यकाल शिल्लक असताना त्रिभाजनाचा निर्णय घेऊन अन्याय केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला. दुसरीकडे शासन आणि प्रशासकांच्या वतीने त्रिभाजनाची भूमिका न्यायालयात मांडण्यात आ
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.