Uddhav Thackeray, Sharad Pawar, Raju Shetti, Nana Patole Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार; 'स्वाभिमानी'च्या नव्या घोषणेने राजकीय गणितं बिघडणार ?

Rahul Gadkar

Kolhapur News: स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या ताकतीने उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यातील सहा जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांच्या नव्या घोषणेने महाविकास आघाडीची गणिते बिघडण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election 2024)

वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जालिंदर पाटील यांनी मोठी घोषणा केली. राजकीय अस्थिरता आणि फुटीरता यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. विश्वास राहिलेला नाही. सध्या अनेक पक्षाचे कार्यकर्ते व नेते आमच्या संपर्कात आहेत. यातून स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातील सर्व जागा लढवण्याच्या भूमिकेत आहे. संपर्कातील योग्य चेहऱ्यांमधून उमेदवारी देऊ, अशी घोषणा 'स्वाभिमानी'चे प्रदेशाध्यक्ष डॉ. जालिंदर पाटील यांनी केली. ते कोल्हापूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. पाटील म्हणाले, "कोण कोणत्या पक्षातून कोणत्या गटात जाईल, याची निश्चित हमी देता येत नाही. पक्षापेक्षा स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रसंगी कार्यकर्त्यांच्या मानेवर पाय ठेवण्याची भूमिका नेते मंडळींनी सुरू केली आहे. यामुळे लोकांचा विश्वास कोणावरही राहिलेला नाही. त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सक्षम अभ्यासू चेहरे हवे आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरता पाहिल्यानंतर अनेक लोकं आणि प्रत्येक जिल्ह्याचे नेते, कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आमच्या 'स्वाभिमानी' पक्षाला एक ताकद निर्माण होत आहे".

"शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी कामगार व कष्टकऱ्यांच्या घामाला दाम मिळवून देण्याचे काम आम्ही केले. आमचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आयुष्य वेचले. स्वाभिमानीचा एक स्वतंत्र बाणा आहे आणि तो बाणा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. लोकांना फक्त आता स्वाभिमानी पक्ष विश्वासाचा वाटू लागल्याने आम्हालाही ऊर्जा निर्माण झाली आहे.

परिणामी राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांतून स्वाभिमानीचे उमेदवार उभा करण्याची तयारी केली आहे. यापूर्वीच बाविसाव्या ऊस परिषदेमध्ये सहा जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. यापैकी हातकणंगले, कोल्हापूर आणि सांगलीमधून आमचे उमेदवार निश्चित आहेत," असं ते म्हणाले.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT