Balasaheb Thorat News
Balasaheb Thorat News sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Balasaheb Thorat News : नगरमध्ये थोरातांच्या वर्चस्वाला विखेंचा सुरुंग; सलग तीन धक्यांमुळे टेन्शन वाढणार?

सरकारनामा ब्यूरो

Nagar District Bank News Election : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री भाजप नेते शिवाजी कर्डिले यांची निवड झाली. भाजपने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) हातातील जिल्हा बँक ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे नगरचे राजकारण आता पुन्हा एकदा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भोवती फिरताना दिसत आहे. यामुळे काँग्रेसचे ज्येष्ट नेते बाळासाहेब थोरात यांना धक्का बसला आहे.

जिल्हा बँकेसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी संचालकांची बैठक मंगळवारी घेतली होती. त्या बैठकीमध्ये जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली होती. त्यानंतरही भाजपचे कर्डिले अध्यक्ष झाले. महाविकास आघाडीची चार मते फुटली. त्यामुळे थोरात यांना धक्का बसला. नगरमध्ये विखे पाटील यांच्यात एक अलिखीत करार होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असते. मात्र, विखे भाजपमध्ये गेले आणि हा करार मोडला, गेला असल्याचे बोलले जात आहे.

नगरच्या राजकारणात नियमित विखे आणि थोरात यांच्यात वर्चस्वाची लढाई असते. भाजपचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर विखे यांनी आघाडी सरकारमध्ये थोरातांच्या वाट्याला असलेले महसूल मंत्रीपद मिळाले. मध्यंतरी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थोरात यांच्या मतदार संघातील ग्रामपंचायतींवर विखे गटाचा विजय झाला. त्या निवडणुकीमध्ये थोरांताना पहिला धक्का बसला.

विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदार सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यावरुन काँग्रेसमध्ये मोठे नाराजीनाट्यही घडले. या निवडणुकीमध्येही विखे पाटलांनी थोरातांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. सत्यजीत तांबे यांच्यावरुन थोरातांना लक्ष्य केले. तर तांबे यांच्या विजयासाठी विखेंनी प्रयत्न केले. तांबेंच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विखे पाटील यांनी केला.

त्यानंतर आता जिल्हा बँकेच्या राजकारणात विखेंनी थोरातांना धक्का दिला. त्याच माध्यातून कर्डिलेंना ताकद दिली. तसचे पुढील नगरमधील राजकारणाची दिशाही ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संगमनेरमधील ग्रामपंचायतीपासून सुरु झालेल्या या लढाईत विखेंनी थोरातांना तीन वेळा मात दिली. तसेच विधान परिषद निवणुकीवरुन काँग्रेसमध्येही थोरात यांच्या राजकारणाला तडा गेला. त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यासाठी राजीनाम्याचे हत्यारही उपसले होते. पटोले आणि थोरात यांच्यामधील वाद मिटवण्यासाठी पक्षाला मध्यस्थी करावी लागली.

आता जिल्हा बँकेतील महाविकास आघाडीची संपूर्ण जबाबदारी थोरात यांच्यावरच होती. बँकेचे राजकारणही त्यांच्याच माध्यमातून चालत होते. मात्र, मतांची झालेली फुट त्यांचीसाठी धक्का आहे. यामुळे आता थोरातांना जिल्ह्यात अधिक लक्ष देण्याची गरज भासणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT