Raj Thackeray Uday Samant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Uday Samant : 'त्यांच्या 4 आणि माझ्या 5 बैठकींचा आउटपुट खिचडी खाण्याइतकच', उदय सामंतांचं ठाकरे बंधूंच्या भेटीवर खोचक टोला

Uday Samant On Uddhav Thackeray–Raj Thackeray Meeting : ते 4 वेळा तर मी राज ठाकरेंची 5 वेळा भेट घेतली होती. या भेटी मागचे आउटपुट मात्र खिचडी खाण्यात इतकाच निघाल्याचा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे. ते आगामी निवडणुकीत काय होणार यावर बोलत होते.

Sudesh Mitkar

Summary :

  1. पुण्यात बोलताना उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली.

  2. त्यांनी म्हटलं की, कोण एकत्र यावं किंवा न यावं हा लोकशाहीचा भाग आहे.

  3. मात्र, कितीही युती-आघाड्या झाल्या तरी महायुतीचाच भगवा पंचायतपासून मुंबईपर्यंत फडकणार असल्याचा दावा केला.

  4. उद्धव-राज ठाकरे एकत्र आले तरी महायुतीवर काही परिणाम होणार नाही, असे सामंतांचे स्पष्ट मत.

  5. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

Pune News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे आज भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे उपस्थित होते. गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची ही चौथी वेळ आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत वेगवेगळ्या राजकीय तर्क लावण्यात येत आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही ठाकरे बंधू युती करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरती भाष्य केला आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांची चार वेळा भेट घेतली असेल तर मी देखील राज ठाकरे यांची पाच वेळा भेट घेतली असल्याचं असल्याचं सांगत उदय सामंत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय होणार याबाबत भाष्य केला आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर पुण्यामध्ये बोलताना उदय सामंत म्हणाले, कोणी एकत्र यावं कोणी एकत्र येऊ नये हा लोकशाहीचा भाग आहे. ते त्यांनी ठरवायचं मात्र किती ही युती आणि आघाड्या झाल्या तरी पंचायत समिती पासून ते मुंबई महापालिकेपर्यंत फक्त महायुतीचाच भगवा फडकणार असून महायुतीची सत्ता येणार आहे. असं सांगत उदय सामंत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी त्याचा महायुतीवर काही मोठा परिणाम होणार नाही असं सांगितले.

गेला काही दिवसात उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना चार वेळा भेटले असले तर मी राज ठाकरे यांची पाच वेळा भेट घेतली आहे. मात्र त्यातून काय आऊटपुट खिचडी खाण्या इतकाच आला असं उदय सामंत म्हणाले. तसेच राज ठाकरे हे महायुतीत आले तर आम्हाला आनंदच आहे. ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. मात्र राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष असल्याने त्यांनी कोणाबरोबर युती करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचेही उदय सामंत म्हणाले आहेत.

FAQs :

1. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर उदय सामंतांनी काय म्हटलं?
त्यांनी सांगितले की ही लोकशाहीचा भाग आहे, पण महायुतीच्या सत्तेवर याचा काही परिणाम होणार नाही.

2. महायुतीबाबत सामंतांचा दावा काय आहे?
सामंत म्हणाले की पंचायत समितीपासून मुंबई महापालिकेपर्यंत भगवा झेंडा महायुतीचाच फडकणार.

3. उद्धव-राज युती महायुतीसाठी धोकादायक ठरू शकते का?
सामंतांच्या मते नाही, कितीही आघाड्या झाल्या तरी महायुतीची सत्ता नक्की येणार.

4. हे वक्तव्य कुठे करण्यात आलं?
हे वक्तव्य उदय सामंत यांनी पुण्यात केले.

5. राजकीय वर्तुळात या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया?
सामंतांच्या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT