MP Udayanraje Bhosale  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News : उदयनराजेंचे सरकारला खडे बोल : आरक्षणप्रश्नी आत्महत्या झाल्या तर त्याला...

Maratha Reservation पंढरपूर ते सातारा पायी प्रवास करून शहाजी दांडगे व ज्ञानेश्वर गुंड यांनी खासदार उदयनराजे यांची जलमंदिर पॅलेस येथे भेट घेतली.

Umesh Bambare-Patil

Udayanraje Bhosale News : मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या रक्ताने लिहिलेले पत्र खासदार उदयनराजे भोसले यांना देण्यासाठी पंढरपूरचे शहाजी दांडगे व ज्ञानेश्वर गुंड हे दोन मराठा युवक पंढरपूर ते सातारा पायी यात्रा करत आज साताऱ्यात दाखल झाले. त्यांनी जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी उदयनराजेंची भेट घेऊन रक्ताने लिहिलेले पत्र दिले. या दोन्ही युवकांचे उदयनराजेंनी कौतूक करुन मराठा आरक्षणप्रश्नी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale म्हणाले, आरक्षण प्रश्नावर Maratha Reservation वादविवाद करण्यापेक्षा विचार करण्याची गरज आहे. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. लोक तुमच्याकडे अपेक्षेने बघत असून तुमच्यावर त्यांनी विश्वास ठेवलाय, त्याला खरे उतरणे गरजेचे आहे.

भुजबळांचा नामोल्लेख टाळून ते म्हणाले, तुम्ही जाती, जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात. दर दहा वर्षांनी जनगणना झाली पाहिजे. त्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देऊन टाका. प्रत्येकाने स्वत: वंचित म्हणायचे पण, तुम्हाला वंचित ठेवले कुणी, अधिकार कोणाचा, असा प्रश्न त्यांनी केला.

उदयनराजे म्हणाले, या देशात प्रत्येकाला राहण्याचा अधिकार आहे. त्यामध्येही तेढ निर्माण केली तर उद्रेक होणारच. आज या युवकांनी रक्ताने पत्र लिहिले आहे. जरंगे पाटील यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. आरक्षण प्रश्नाचे राजकारण करत असला तर मग जनगणना होत नाही, तोपर्यंत निवडणुकही घेऊ नका.

प्रत्येकाने आम्ही सर्वोच्च न्यायालयातून हे आणलं ते आणलं हे कशाला दाखवताय. ही लोक स्वत:च्या राजकिय महत्वकांक्षेसाठी सर्व काही करत असतील तर ते योग्य नाही. मतदार राजा असतो. त्याला सन्मानाने वागविले पाहिजे. अन्यथा तुम्हाला ते पायाखाली घ्यायला मागे पुढे पाहणार नाहीत. आरक्षण प्रश्नावरुन आत्महत्या होऊ लागल्या तर याला सरकारच जबाबदार असेल. Maharashtra Political News

सर्वांना माहिती असूनही सर्वजण मुग गिळून गप्प आहेत. युवकांची वये निघून जाऊन त्यांची नोकरीची संधी जात आहे. माझी कळकळीने व मनापासून विनंती आहे, राज्यातील लोकांवर मेहरबानी करा. सगळ्या जातीतील लोकांना न्याय देण्याचे काम करा. केवळ एक विशिष्ट जात पकडून चालू नका, असा सल्लाही उदयनराजेंनी शेवटी दिला.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT