Vanchit Bahujan Aghadi  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vanchit Bahujan Aghadi: वंचितमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार; सोलापुरसाठी वंचितकडून सात जण इच्छुक

Mangesh Mahale

राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भूमिका लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) ही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरली होती. वंचितमुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. यंदाच्या निवडणुकीतही वंचितमुळे काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोलापूर लोकसभेची जागेसह अन्य जागांही (Solapur Lok Sabha Constituency2024) लढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची जय्यत तयारी केली आहे. सोलापूर मतदारसंघासाठी वंचित कडून सात जण इच्छुक आहेत. त्यामुळे सोलापुरात भाजपा, काँग्रेस आणि वंचित यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

19 एप्रिलनंतर सोलापुरात प्रकाश आंबेडकरांची सभा होणार आहे. 2019 च्या सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना 1 लाख 70 हजार मते मिळाली होती. यंदा प्रकाश आंबेडकर हे अकोला मतदारसंघातून लोकसभा लढविणार आहेत. वंचितमुळे गेल्या लोकसभेप्रमाणेच लोकसभा 2024 मध्ये सुद्धा काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019च्या निवडणुकीत 8 ते 9 मतदारसंघात वंचितने घेतलेल्या मतांमुळे काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला होता. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम (AIMIM) यांनी एकत्र येऊन ही वंचित बहुजन आघाडी तयार केली होती. वंचितने निवडणुकीत 14 टक्के मते मिळवून आपली ताकद दाखवून दिली होती. इतकंच नव्हे तर औरंगाबादची जागाही खेचून आणली होती. आगामी लोकसभा स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय वंचितने घेतला आहे. आत्तापर्यंत आठ जागांची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली. अन्य जागांवरील उमेदवारांची घोषणा लवकरच आंबेडकर करणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 41 लाख मते घेतली. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही व्होटबॅंक पूरक होती. पण, वंचितने ही मते घेतली. राज्यातल्या एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 39 ठिकाणावर वंचितचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे राष्ट्रवादीला जवळपास 11 जागा गमवाव्या लागल्या असा दावा राष्ट्रवादीने केला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले नाही. त्यामुळे वंचित आघाडीने आपले उमेदवार उभे केले. वंचितच्या 15 उमेदवारांनी साधारण 90 हजार ते 3 लाखांपर्यंत मते मिळवली आणि तीच मते कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या पराभवाला कारणीभूत ठरली.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदार संघातून भाजपचे जय सिद्धेश्वर स्वामी विजयी झाले. त्यांनी काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर रिंगणात होते.

  • जय सिद्धेश्वर स्वामी (भाजप) - 5,24,985

  • सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) - 3,66,377

  • प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी) - 1,70,007

(सोलापूर लोकसभा निवडणूक लढवणार 2019)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT