Mumbai News : आज सकाळी मुंबई मोठा रेल्वे अपघात झाला असून ज्यात 8 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला असून 10 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात CSMT कडे जाणाऱ्या मुंब्रा दिवा रेल्वेला झाला. या प्रकरणी आता महराष्ट्र नव निर्मिण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी यावरून सरकारला धारेवर धरले असून रेल्वेमंत्र्यांच्या राजीनवाम्यावर भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी राज ठाकरे- उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार अशी गोष्टी दाखवण्यापेक्षा आपल्या शहरातील महत्वाचे प्रश्न का दाखवले नाहीत? आतातरी ते दाखवणार की नाही असा सवालही पत्रकारांना केला आहे.
मुंबईत सकाळी झालेल्या रेल्वे अपघातावरून राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरताना या सरकारला माणसांची किमत नाही. मुंबईत रेल्वे काही नवी. याबाबत अनेकदा मागणी केली आहे. पण रेल्वेमंत्री काय करतात, असाही सवाल त्यांनी केला असून आता छान वाटतंय त्यांचा राजीनामा मागितला जातोय. पण कशाला हवाय रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा? त्यांनी अपघात झालेल्या ठिकाणी जावं. पाहणी करावी. जे घडलय ते निस्तरावं असा हल्लाबोल केला आहे.
आपल्याकडे टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच नसून रस्ते नाहीत. पार्किं नाही. ट्रफिकची समस्या उद्धवली आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्यासारख्या शहरात तर ही समस्या अधिकच मोठी होताना दिसत आहे. मुंबईत एखाद्या ठिकाणी आग लागल्याल फायर ब्रिगेडचा बंब आत जाऊ शकत नाही अशी अवस्था असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
येथील रेल्वेचा सध्या बोजारा उडाला असून याला कारण येथे येणारे बाहेरचे लोंढे असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच मुंबईत मेट्रो, मोनो रेल्वे सर्व आहे. पण त्या नक्की कोण वापरतंय हे देखील आता पाहणं गरजेचं असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी शहरातल्या प्रश्नावरून पत्रकारांना देखील निशान्यावर घेताना, शहरातील अडचणीच्या गोष्टी, समस्या दाखवण्यापेक्षा, सरकारचे लक्ष वेधण्यापेक्षा नको त्या आणि शुल्लक गोष्टी पत्रकार दाखवत असतात. आता अशा गोष्टी दाखवणार का? की फक्त राजकारणातील गोष्टी दाखवून तुला काय वाटतं, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं, हेच करणार आहात? असाही सवाल केला आहे.
तर ही घटना दुर्दैवी असून आता केंद्र सरकारनेच यात लक्ष घालावं. तातडीनं लक्ष घालावं, अशीही मागणी त्यांनी केली आहे. तसेच लॅटफॉर्मवर लोक कसे आत जातात आणि कशी बाहेर येतात हाच मोठा गंभीर प्रश्न आहे. मी देखील कॉलेजला असताना प्रवास करत होतो. यामुळे गर्दी काय असते याची जाणीव आहे. पण त्यावेळी तशी गर्दी नव्हती. मात्र आताची गर्दी. सध्याकाळी त्यात शिरून दाखवा. तरीदेखील मुबईकर यातून प्रवास करतात जे विलक्षण असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.