Eknath shinde, Raj Thackeray And Uddhav Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Shirsat : ठाकरे बंधू एकत्र येणार? आधी शिंदेंचा पारा चढला अन् आता शिलेदार भडकला; म्हणाला, 'चांडाळ चौकडी...'

Sanjay Shirsat on Raj Thackeray-Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. पण या चर्चा काही लोकांना आवडलेल्या दिसत नाहीत.

Aslam Shanedivan

Mumbai News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या पायाखालील वाळू सरकाणारी संकेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती करण्याचे संकेत दिल्यानंतर आता राज्याच्या राजकारण एकच खळबळ उडाली आहे. तर राज्यातील जनतेसह काही प्रमुख नेत्यांना असं झाल्यास ते राज्याच्या हिताचे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर सध्या राज्यात सुरू झालेल्या चर्चांमुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पोटात गोळा आला आहे. यावरून भाजप नेते अशिष शेलार यांनी तिखट प्रतिक्रिया दिली असतानाच एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याने बोचरी टीका केली आहे. यामुळे शिंदेची शिवसेना या चर्चांनी खूश नसल्याचे आता समोर आले आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती व्हावी, अशी मागणी अनेक वर्षापासून राज्यातील जनता आणि शिवसेनेसह मनसेतील नेते आणि पदाधिकाऱ्यांची आहे. त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत तसे संकेत दिले. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्यास आपल्याला कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. त्याला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपणही सोबत येण्यात तयार आहोत. पण आमची भूमिका ठाम असून त्यांनी तशी टाळी दिल्यास काहीच हरकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. यामुळे आता ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान या चर्चा भाजपपाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या पचनी पडलेल्या दिसत आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरेंशी असलेले वैयक्तकिक संबंध संपल्याचं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीनंतर उद्धव ठाकरेंनी घातलेल्या काही अटींमुळे राज ठाकरे युती करणार नसल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय.

तर याबाबत शिंदे गटाचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना टोलेबाजी केली आहे. शिरसाट यांनी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास आपल्याला आनंदच होईल, असे म्हटलं आहे. पण यावेळी त्यांनी शिवसेना उबाठा आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष निशाना साधला आहे.

शिरसाट यांनी राऊतांचे नाव न घेता, राज ठाकरे यांच्यासोबत आल्यावर पवारांची आणि काँग्रेसची चाकरी कोण करणार? असा टोला देखील राऊतांना लगावला आहे. तर आपण, चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही, असाही निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील यावरून खोचक टीका केली आहे. सामंत यांनी, आम्हाला कोणाबद्दल पोटदुखी नाही. स्थानिकांना नव्याने सामावून शिंदे साहेबांनी घेतले आहे. तसे मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे स्वतःचे विचार असलेले एक नेतृत्व आहे. पण आता त्यांना अशा काही अटी घातल्या जात आहेत.

त्यांनी भाजपबरोबर बोलायचं नाही, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बोलायचं नाही. शिंदेंची सावली पडता कामा नये. दिल्लीतील लोकांच्या संपर्कात राहता कामा नये. हा काही क्रीडा महोत्सव चालू आहे का? युती म्हणून दोघे भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला कोणाला अडचण असण्याच कारण नाही. मात्र राज ठाकरे यांचा स्वभाव बघता युती होईल, असे वाटतं नसल्याचेही सामंत यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT