Sanjay Raut1 Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut : 'अमित शाह, भाजपच्या त्यागाच्या भाषेवर राऊत कडाडले'; म्हणाले, 'महाराष्ट्रावर सूड...'

Pradeep Pendhare

Mumbai News : "भाजपची लोकं स्वार्थी आहेत. त्यागाची भाषा त्यांना शोभत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजप नेते त्यांच्या सोयीचं पाहतात. त्याग, अस्मिता आणि बलिदान, अशी शब्द त्यांना शोभत नाही", असा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला फटकारले.

भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागा वाटपावरून भाजपने केलेल्या त्यागाची आठवण करून दिली. त्याग करत तुम्हाला मुख्यमंत्री केलं, याचा विसर पडू देऊ नका, असे अमित शाह यांनी म्हटले होते. यावर संजय राऊत यांनी भाजप आणि त्यांच्या नेत्यांना चांगलेच फटकारले.

संजय राऊत म्हणाले, "विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राज्य सरकारच्या सोयीच्या तारखेचा बघितल्या गेल्या आहेत. जनतेच्या सोयीच्या तारखांचं काहीच नाही. अमित शाह किंवा भाजपने कोणताही त्याग केलेला नाही. अमित शाह यांना महाराष्ट्रावर सुड घ्यायचा होता. शिवसेना (Shiv Sena) तोडायची होती. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला करायचा होता. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या माणसांचा वापर करून घेतला".

'अमित शाह आणि भाजप नेत्यांच्या लोकांना त्याग आणि बलिदान, अशी शब्द शोभत नाही. हा त्या शब्दांचा अपमान आहे. महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे प्रादेशिक अस्मितेचे पक्ष तोडणं, त्यासाठी आपल्या लोकांना काही दिवस जुळवून घ्यायला सांगितलं. याला त्याग, असे म्हणताच येणार नाही. स्वार्थ, असे म्हणतात. महाराष्ट्राची लूट केली, त्याला त्याग असे म्हणता येईल?' असा प्रश्न संजय राऊत यांनी केला.

भाजप मदारी...

'भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा त्याग आम्ही पाहिला. 50 कोटीची जमीन कवडीमोल भावात ओरबडली आहे, हा त्याग आहे का? त्याग आणि बलिदान हे शब्द यांना शोभत नाहीत यांना! भाजप या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा खेळ संपवेल. एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा खेळ भाजपच संपवेल. भाजप हा मदारी आहे आणि ही सगळी माकडं आहेत. हे भाजपवाले त्यांना आपल्या तालावर माकडांना नाचवणार आणि पुढं सोडून देणार', असेही संजय राऊत यांनी म्हटले.

दोन दिवस बैठकांचे सत्र

महाविकास आघाडीच्या दोन दिवसात बैठकांचे सत्र सुरू राहणार आहे. जागा वाटपासंदर्भात ताबडतोड हालचाली व्हाव्यात, यासाठी तिन्ही पक्ष कार्यरत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा करून, काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा करणार आहोत. आम्हाला वेळ पुरसा आहे. आम्हाला पैसे वाटप करायचे नाही. जसे समोरचे लोकं करत आहेत. आमचा प्रचार झाला आहे. महाराष्ट्रातील जनतेला धडा शिकवण्याचे ठरवलेलं आहे. गद्दार, बेईमानांची सरकार, भ्रष्टाचारी, खोकेवाल्यांचे सरकार महाराष्ट्रातून घ्यालवायचं आहे, हे जनतेने ठरवल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT