Tukda Bandi: बहुचर्चित आणि महत्वाचं तुकडे बंदी सुधारणा विधेयक विधीमंडळात आज एकमतानं मंजूर झालं. त्यामुळं छोट्या तुकड्यांमध्ये घरं बांधलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना हे स्पष्ट केलं.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या उत्तरानुसार या विधेयकामुळं ज्यांनी जमिनिचे छोटे-छोटे तुकडे घेऊन घरं बांधली त्यांना या कायद्याचा फायदा होईल. हा महसूलचा तुकडे बंदी कायदा असल्यानं त्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. नागरिकांना जमिनीचे हिस्सेवाटप आणि खरेदी करण्यात कायदेशीर अडचणी येऊ नये म्हणून हे विधेयक आणलं आहे. रजिस्ट्री, खरेदी असे अनेक मुद्दे या कायद्यामुळं अडले होते. आम्ही नगरविकासाच्या कुठल्याही कायद्याला हात लावत नाही. या प्रक्रियेचे एकही पैसा न घेता मानवीकरण करणं सुरू आहे. या कायद्याने डीपीचे कोणतेही प्लॅन बदलणार नाहीत.
राज्यात आरपी आणि डीपी दोन्ही सुरू आहेत. परंतु हा कायदा सरसकट ग्रामीण भागासाठी आणता येणार नाही, कारण हा कायदा सरसकट आणला तर शेतीच राहणार नाही. ग्रामीण भागातील केवळ रहिवासी क्षेत्रासाठी हा कायदा लागू असेल. सरकारी जमिनीवर कुणी तुकडे पडले असतील तर त्यांना देखील याचा फायदा होणार नाही. यासाठी एक एसओपी तयार करण्यात आली आहे. या विधेयकाचा ६० लाख लोकांना फायदा होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, सत्ताधारी आमदार आणि विरोधक यांच्या एकमताने अखेर हे विधेयक मंजूर झालं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.