Envirnment Minister Aditya Thakre
Envirnment Minister Aditya Thakre Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आदित्य ठाकरेनी नेत्यांना नाराज केले मात्र नाशिककरांची मने जिंकली!

Sampat Devgire

नाशिक : सिडकोतील (Nashik) त्रिमूर्ती चौक व मायक्रो सर्कल येथे प्रस्तावित अडीचशे कोटी रुपयांच्या उड्डाणपुलावरून सुरू असलेल्या वादाला राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांनी पूर्णविराम दिला. यावेळी त्यांनी पुलाची खरोखर गरज आहे का? असे सुचक विधान केले. त्यातून शिवसेना, (Shivsena) भाजप (BJP) नेत्यांचे हितसंबंध दुखावणार असल्याने ते नाराज होण्याची शक्यता आहे. नाशिककर मात्र जाम खुश होणार हे नक्की.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथे ज्याप्रमाणे रस्त्यांची आवश्यकता नव्हती, त्याचप्रमाणे सिडकोत उड्डाणपुलाची आवश्यकता आहे का, याबाबत विचार करू असे स्पष्ट आश्‍वासन त्यांनी नाशिककरांना दिले.

मायको सर्कल व सिडको येथील त्रिमूर्ती चौकात अडीचशे कोटी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती केली जाणार आहे. परंतु, उड्डाणपुलाचे भूमिपूजन होण्यापूर्वीच गेल्या अडीच महिन्यांपासून वाद-विवाद सुरू आहे. पुलासाठी वापरण्यात येणारे एम ४० ऐवजी एम ६० प्रतीचे सिमेंट वापरणे वरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यासाठी महापालिकेने ४४ कोटी रुपये अतिरिक्त मोजण्याची तयारी दाखविली आहे. ४४ कोटी रुपये अतिरिक्त मोजताना पुलाच्या संरचनेत देखील बदल होणार असल्याने त्यावरून आणखीन एक नवीन वाद निर्माण झाला आहे. या विरोधात भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर पूल तयार करताना ५८८ वृक्षांची तोड होणार असल्याने पर्यावरणप्रेमी या विरोधात एकत्र आले आहे.

त्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात पर्यावरणप्रेमींनी चिपको आंदोलन करत आदित्य ठाकरे यांना ट्विट करून वृक्ष तोडू नये, अशी विनंती केली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वृक्ष तोडला जाणार नाही, अशी घोषणा करतानाच प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन पाहणी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी सांयकाळी ठाकरे यांनी उंटवाडी येथील दोनशे वर्षांपूर्वीचा जुना वृक्ष असलेल्या जागेला भेट दिली. या वेळी स्थानिक नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत करताना ‘वृक्ष वाचवा’ घोषणा दिल्या. या वेळी ठाकरे यांच्यावर निवेदनाचा पाऊस पडला.

शहराचा शाश्वत विकास महत्त्वाचा

या वेळी बोलताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दोनशे वर्षांपूर्वीचा वटवृक्ष वाचविण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, शहराचा शाश्वत विकास महत्त्वाचा. पर्यावरणाची हानी होऊ देणार नाही. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरीचा रस्ता आवश्यक नव्हता. त्याचप्रमाणे उड्डाणपुलाची आवश्यकता आहे का, याबाबत विचार करू नंदिनी नदी संवर्धनासाठी नाशिककरांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT