Kisan Sabha News
Kisan Sabha News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kisan Sabha News : किसान सभेचा पुन्हा एल्गार; महसूल मंत्र्यांच्या कार्यालयावर राज्यव्यापी पायी मोर्चा

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात किसान सभेने पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आता पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले ते लोणी असे चालणार आहेत. हा मोर्चा 26 एप्रिल पासून 28 एप्रिलपर्यंत चालणार आहे.

या मोर्चात किसान सभेचे अशोक ढवळे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी होणार आहेत. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, तसेच गायरान जमिनीचे प्रश्न, दुध धोरणासह विविध मागण्यासंदर्भात किसान सभा आक्रमक झाली आहे.

याआधी मार्चमध्ये किसान सभेने नाशिक ते मुंबईच्या दिशेने लाँग मार्च काढला होता. हा लाँग मार्च पाच दिवस चालल्यानंतर किसान सभेच्या शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी हा लाँग मार्च स्थगित केला होता.

दरम्यान, राज्य सरकारने आश्वासन देऊनही एक महिना झाला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, यासाठी आता किसान सभेच्यावतीने राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर 26 ते 28 एप्रिल दरम्यान पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच याबाबत किसान सभेकडून एक फोटो देखील शेअर करण्यात आला आहे.

(Ediited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT