Manikrao Kokate sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate: कृषिमंत्र्यांनी महिनाभरात दुसऱ्यांदा बळीराजाला दुखावलं! कोकाटे पुन्हा बरळले; पाहा VIDEO

Manikrao Kokate’s Controversial Statement on Farmers : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी सिन्नर येथे गेलेल्या कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर केलेल्या या विधानामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Mangesh Mahale

काही दिवसापूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवरून शेतकर्‍यांचा अपमान केला होता, या घटनेला महिना पूर्ण होण्याआधीच पुन्हा एकदा कृषिमंत्र्यांनी अतिवृष्टीमुळे आधीच संकटात सापडलेल्या बळीराजाला दुखावलं आहे.

त्यांनी केलेल्या विधानामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी सिन्नर येथे गेलेल्या कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर केलेल्या या विधानामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवाल त्यांनी शेतकऱ्यांना केला. कोकाटेंनी केलेले हे विधान विरोधकांना मिळालेले आयते कोलीतच आहे.

महिनाभरापूर्वी कोकाटे यांनी शेतकऱ्यांना ‘भिकारी’ म्हणत, कर्जमाफीची रक्कम लग्नासाठी खर्च केली जाते, असा गंभीर आरोप केला होता. त्यावेळी त्यांना विरोधकांनी धारेवर धरलं होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोकाटेंच्या विधानावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. आज कोकाटेंनी केलेल्या नव्या वादग्रस्त विधानामुळे ते पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या या विधानाचा विरोधक कसा समाचार घेणार हे लवकरच समजेल.

राज्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबा, कांदा, भुईमूगाच्या शेंगा यांसारखी पिके जमीनदोस्त झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. नुकसान भरपाई मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना कोकाटेंनी दिलासा देण्याऐवजी दुखावल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कृषिमंत्र्यांनी उधळली 'मुक्ताफळे'

नाशिक जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्षे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे शेतकरी हवालदिल झाला. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी कृषीमंत्र्यांनी ही 'मुक्ताफळे'उधळली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT