Radhakrishna Vikhe On Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe On Sanjay Raut : '...तर मुंबईतील भूखंड घोटाळ्यावर वेगळं पुस्तक'! मंत्री विखेंचा शिवसेनेला खोचक टोला

Radhakrishna Vikhe Reacts to Sanjay Raut Book 'Narkatla Swarg' Ahilyanagar BJP News : भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत लिखित 'नरकातला स्वर्ग' पुस्तकावर प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

Sanjay Raut book Narkatla Swarg : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत लिखित 'नरकातला स्वर्ग', पुस्तकाचं उद्या शनिवारी मुंबईत प्रकाशन होणार आहे. संजय राऊत यांनी हे पुस्तक मुंबईतील बहुचर्चित 'पत्राचाळ' कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली होती, त्यावेळी 100 दिवस तुरुंगात, असताना, त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे.

या पुस्तकाताचं, आता उद्या, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. या पुस्तकातील दाव्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पुस्तक प्रकाशनापूर्वी, अन् त्यातील काही दाव्यावर खोचक, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत यांचे नरकातील स्वर्ग पुस्तकाचे उद्या शनिवारी मुंबईत प्रकाशन होणार आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबाबत पुस्तकात केलेले काही दावे पुढं आल्याने राज्याचे राजकारण तापले आहे. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाविरुद्ध भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना जोरदार प्रतिवाद करत आहेत.

भाजपचे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी यावर खोचक प्रतिक्रिया दिली. मंत्री विखे पाटील म्हणाले, "संजय राऊत एक राज्याला लागलेली विकृती आहे. मोदींवर बोलणे तसेच लिहिणे एवढी राऊत यांची पात्रता नाही. मुंबईमधील अनेक भूखंडाचे घोटाळे, जर बाहेर काढले, तर एक वेगळेच पुस्तक त्यांच्यावर छापावे लागेल".

विखे पाटील यांनी पदाचा मान आपण राखला पाहिजे. अशा विकृत माणसांविषयी आपण काय बोलावे. ज्यांनी जनाधार गमावला आहे, लोकांचा विश्वास गमावला आहे, त्यांनी अशी पुस्तके लिहिणे अन् प्रसिद्धीच्या झोतात राहणे, एवढेच बाकी राहिले आहे. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.

फडणवीसांनी राऊतांच्या दाव्याची खिल्ली उडवली

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय राऊत यांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. "मी कांदबऱ्या वाचनं कधीच सोडलेलं आहे. कथा-कांदबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं वय राहिलेलं नाही. त्याच्यामुळे मी असल्या गोष्टी वाचत नाही", असे म्हणत ही खिल्ली उडवली. तसेच अधिकचे प्रश्न विचारताच, 'त्यांचे सोडून द्या, ते कोण आहेत. ते खूप मोठे नेते आहेत का?', असे प्रति प्रश्न करत, संजय राऊत यांच्या मुद्याला बगल दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT