Chhagan Bhujbal On Imtiaz Jaleel 
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal On Imtiaz Jaleel : इम्तियाज जलीलांचा 'टायमिंग' हुकतोय की जुळतोय? भुजबळ म्हणाले, 'त्यांनी कधी बाळासाहेबांसोबत...' (VIDEO)

AIMIM Imtiaz Jaleel Accuses Balasaheb Thackeray of Caste Politics NCP Minister Chhagan Bhujbal Hits Back : बाळासाहेब ठाकरेंनी जातीच्या राजकारणावर इम्तियाज जलील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेला मंत्री छगन भुजबळांनी फटकारलं.

Pradeep Pendhare

Maharashtra political controversy : 'AIMIM'चे इम्तियाज जलील गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर विविध आरोप करत असतानाच, ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाशी जवळ साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

यातच त्यांनी सोलापूर इथं उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे यांच्या जातीविरहीत राजकीय वाटचालीचं कौतुक करताना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जातीच्या राजकारणावर टिप्पणी केली. इम्तियाज जलील यांना या टिप्पणीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार 'एनसीपी'चे मंत्री छगन भुजबळ यांनी फटकारलं आहे. यावरून टायमिंग हुकतोय की जुळतोय? अशी आता चर्चा सुरू झाली आहे.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, "इम्तियाज जलील हे कधी बाळासाहेब यांच्या सोबत होते? कधी त्यांनी त्यांच्यासोबत काम केले? बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी सर्वच जातीच्या लोकांना न्याय दिला. माझ्यासारख्या माळी समाजाचा कार्यकर्त्याला नगरसेवक म्हणून निवडून आणले, महापौर केले. तसेच इतर सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या जातीचे कार्यकर्ते जोडलेले आहेत".

'मी बाळासाहेब यांच्या अगदी जवळ होतो. बाळासाहेबांना कधीच जातीचे राजकारण केलेले पाहिले नाही. 'AIMIM'चे इम्तियाज जलील यांचे विधान साफ चुकीचे आहे', असे म्हणत मंत्री भुजबळांनी (Chhagan Bhujbal) जलील यांना फटाकारलं.

जलील काय म्हणाले...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत वैचारिक आणि राजकीय मतभेद आहेत. उद्धव ठाकरे हे चांगले नेते आहेत. कारण, उद्धव ठाकरेंनी कधीही जातीला प्राधान्य दिले नाही. जातीच्या आधारावर राजकारण केलेलं नाही. मात्र,महाराष्ट्रात जातीची राजनीती ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणली आहे, असा घणाघात 'AIMIM'चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला.

गुजरात्यांनी शिवसेना फोडली

जातीच्या राजनीतीला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कधीही महत्व दिलेले नाही. जेव्हा गुजरात्यांनी मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी शिवसेना फोडली, तेंव्हा एक महाराष्ट्रीयन माणूस म्हणून मला वाईट वाटलं, असे म्हणताना महाराष्ट्रीयन लोकांचा आवाज ही शिवसेना होती. त्याला फोडण्याचं काम भाजपच्या लोकांनी केलं, असा टोला देखील जलील यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT