Aiit Pawar, Dy. C. M.
Aiit Pawar, Dy. C. M.  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था गिरणी कामगारांसारखी होऊ नये

Sampat Devgire

नाशिक: एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत राज्य शासनाने अतिशय चांगला तोडगा काढला. स्वतः शरद पवार यांनी त्यावर मार्ग काढला. तरीही कामगारांचे आंदोलन सुरुच आहे. हे अयोग्य आहे. या कामगारांची अवस्था मुंबईतील गिरणी कामगारांसारखी न होवो, याची काळजी वाटतेय, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

ते म्हणाले, राज्यासमोर इतके नैसर्गिक संकट असताना एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या अनुभवानुसार मार्ग काढला. मात्र, तरीही हे आंदोलन काहींनी सुरुच ठेवले आहे, जे योग्य नाही. संपकऱ्यांनी तुटेपर्यंत ताणू नये, असे आवाहन करीत संप मागे घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना केले.

श्री. पवार म्हणाले, १९८२ साली गिरणी कामगारांचा संप झाला तशी अवस्था एसटी कामगारांची होऊ नये. तुटेल इतके ताणू नका. गोरगरिबांची एसटी आहे. सरकार एक पाऊल मागे आल आहे. तुम्ही एक पाऊल मागे या. तुम्हीही महाराष्ट्राचे आहात. तुम्हालाही इथली परिस्थिती माहीत आहे. तिथे काय काय बोलताय, ही काय महाराष्ट्राची संस्कृती आहे का? जे कामगार आले त्यांचे आभार आहे. मी यापूर्वी सांगितले आहे विलिनीकरणावर समिती केली आहे. तिचा निर्णय येऊ द्या, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT