Eknath Khadse and Devendra Fadnavis Latest News
Eknath Khadse and Devendra Fadnavis Latest News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राज्याच्या राजकारणात भविष्यात काहीही होऊ शकते, खडसेंच सूचक वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजपा नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) यांनी आज (ता.३०ऑगस्ट) मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरेंची (Raj Thackeray) त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट घेतली आहे. यामुळे राजकीय चर्चेला मोठ उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज आणि भाजपा नेत्यांच्या गाठीभेटीवरून भाजपा-मनसे युतीबाबत बोलले जात आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपली प्रतिक्रिया दिली. भविष्यात राजकारणात काहीही होऊ शकते, असे वक्तव्य त्यांनी केलं आहे. (Eknath Khadse, Devendra Fadnavis & BJP Latest News)

खडसे म्हणाले की, पूर्वीच्या काळातील भाजप आणि आताच्या भाजपमध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. पहाटेच्या वेळी अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीस शपथ घेतील असे वाटले नव्हते. तसेच त्यानंतर एकनाथ शिंदे हे देखील सुमारे ५० आमदार घेऊन बाहेर पडतील आणि भाजपसोबत सरकार बनवतील असेही वाटले नव्हते. मात्र राजकारणात भविष्यात काहीही होऊ शकते. त्यामुळे भाजप-मनसे भविष्यात एकत्र आल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान कौटुंबिक संबंधातून राज यांची भेट घेतली असून याचा राजकीय अर्थ काढू नये. युतीबाबतचा जो काही निर्णय घ्यायचा तो राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, अमित शाह आणि फडणवीस घेतील. मी प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजप कशी वाढेल ही फक्त माझी जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे. तसेच त्यांनी राज यांच कौतुक करत म्हणाले की, राज ठाकरे हे नेहमीच हिंदुत्वाची बाजू मांडत असतात. ते हिंदुत्वाचे रक्षण करत आले आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्यात काही गैर काय आहे? याचबरोबर हिंदुत्व आणि महाराष्ट्राचं रक्षण करणाऱ्या नेतृत्वाला भेटण्यात काही अडचण नसल्याचही त्यांनी सांगितलं. जवळपास १ तास राज ठाकरे आणि बावनकुळे यांच्यात चर्चा झाली आहे.

दरम्यान, खडसे यांनी सरू असलेल्या राजकारणावर भाष्य करतांना हे वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत केलेलं बंड असो किंवा फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेली पहाटेची शपथ असो यावरू भविष्यात आताच्या राजकारणात काहीही होऊ शकते कुणीही कुठे जाऊ शकतो. असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता. मात्र बाजी पलटून सत्ताधाऱ्यानाही भविष्यात झटके बसू शकतात, असा इशाराही खडसेंनी या विधानातून केल्याचं बोललं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT