Gulabrao Patil, Chimanrao Patil
Gulabrao Patil, Chimanrao Patil sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गुलाबरावांवर शिंदे गटातील आमदारांचा वार : मी खानदानी माणूस म्हणून सहन केले...

कैलास शिंदे

जळगाव : आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपल्याला शिवसेनेत (ShivSena) त्रास दिला. मात्र, आता तेच शिंदे गटात आल्याने आपल्या पदरात पुन्हा तेच आल आहे, अशी खंत शिवसेना बंडखोर व शिंदे गटाचे पारोळा तालुक्यातील आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. याबाबत जामनेर येथील एका कार्यकर्त्यांशी बोलतांना त्यांची ऑडियो क्लीप सोशल मीडीयवर व्हायरल झाली आहे.

आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यात आपल्यावर शिवसेनेत अन्याय झाल्याची खंत व्यक्त करीत आहेत. याबाबत ते म्हणतात, शिवसेनेत आपल्याला मोठ्या प्रमाणात त्रास झाला. जामनेरलाही तोच त्रास दिला आहे. आमदार गुलाबराव यांच्यापासूनच त्रात आहे. आपण वरीष्ठ नेत्यांना त्याबाबत सांगून-सांगून कंटाळलो. मात्र, एकानेही आपल्याकडे लक्ष दिलेले नाही. मला मतदारसंघात निधी दिला नाही, इतका त्रास दिला कि मी शिवसेनेत राहू नये म्हणून ही मंडळी मला त्रास देत आहेत, असे मी मी स्वत: उध्दव साहेबांना (Uddhav Thackeray) भेटून सांगितले. मात्र, त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी आपल्याला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाडले, तरी गुलाबराव पाटील यांना मंत्री केले.

मग किती दिवस सहन करायचे मग मरायचे काय? आता जे होईल ते पाहू, मला शिवसेनेत न्यायच मिळत नव्हता, डायरेक्ट उद्घाटनाला यायचे ना ते मला विचारीतही नव्हते. मी इतक सहन केल की मी खानदानी माणूस म्हणून हे सर्व सहन केले. मी उध्दव साहेबांनाही सांगितले, साहेब मी गेली २९ वर्षे शिवसेनेत आहे. माझी एक तरी चुक दाखवा परंतु त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांच्या त्रासामुळे मी काय करणार आमचे कार्यकर्ते मरायला लागले होते. पोलीसातही आमच्या विरोधात गुलाबराव पाटील फोन करीत होते, असा दावा चिमणराव पाटील यांनी केला.

अधिकाऱ्यांना तसेच सहकार विभागही अधिकाऱ्यांना फोन करून माझ्या विरोधात निकाल दे असे सांगायचे, आता तेच गुलाबराव पाटीलही तिथे आले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यावेळ आमदार पाटील म्हणाले, ते आपल्यानंतर आल आहेत. या माणसाला एवढे मंत्री केले ते तिकडून फुटतील असे वाटत नव्हते. यांचे दहा जन्मही उध्दव साहेबांचे उपकार फिटले नसते. मी उध्दव साहेबांना हे सुध्दा सांगितले, कि साहेब मी शिवसेनेत राहू नये म्हणून हे असे करीत आहेत.

कार्यकर्ता संवादात म्हणतो, आबा, तुम्हाला सांगतो हे अन्यायबाज लोकच आता शिंदे गटातही आहे. मग तुमच्यावर तिथेही अन्याय होणार आहे आता काय करणार? त्यावर आमदार चिमणराव पाटील म्हणतात, जे होईल ते होईल आता काय करायचे शिवसेनेत वरीष्ठ नेते माझ्याशी कोणी बोलतही नव्हते ना हो, जिल्हा बँकेचा व्हाईस चेअरमनपदी अमोल याला करावे, अशी जिल्हयाची इच्छा होती. यांनी मात्र चंदूअण्णा याच्या भावाला केले. किती दिवस लढणार यांच्याशी, मी शिंदे साहेबांना आपल्याला होणाऱ्या त्रासाबाबत सांगितले आहे.

ते पाहतील आता जे होईल ते बघू, आपल्याला मंत्रीपदाचे काही नाही. केवळ सन्मान हवा होता. यावर कार्यकर्ता म्हणतो, आबा गुलाबरावांना जिल्हयात शिवसेना संपविली त्यावर चिमणराव पाटील म्हणतात, त्यानी जामनेरात, चाळीसगावात शिवसेना वाढू दिली नाही. हे मला माहिती आहे. शिवसेना संपायला ते कारणीभूत आहेत. ते बोगस आहेत एकदम. त्यावर कार्यकर्ता म्हणतो, आबा तुम्ही यांची साथ सोडा पुन्हा उध्दव साहेबांकडे जा त्यासाठी मी देवाला साकडे घालतो, त्यावर आमदार चिमणराव पाटील म्हणाले, बघू, बघू!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT