Bachhu Kadu News: राज्यातील आणि देशातील शेतकरी संकटात सापडला आहे. ही संकटे सातत्याने वाढतच आहेत. त्याचे निराकरण करण्याची कोणाचीही मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विचार गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना अमळनेर (जळगाव) येथील साथी गुलाबराव पाटील राजकीय पुरोगामी पुरस्कार देण्यात आला. यावेळी पत्रकार निरंजन टकले यांना गुलाबराव पाटील सामाजिक पुरस्कार देण्यात आला. यावेळी श्री कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सध्याची व्यवस्थेत आणि सरकार उदासीनता आहे, असा आरोप केला.
जात, धर्म, पंथ आणि राजकीय गुलामी यामुळेच शेतकऱ्यांमध्ये एकोपा निर्माण होत नाही. या स्थितीचा गैरफायदा व्यवस्था आणि सरकार घेते. शेतकऱ्यांच्या दुरावस्थेला ही स्थिती जबाबदार आहे, असे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या समस्या कमी होत नाहीत. यासंदर्भात विविध संघटना प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यांना समस्या मुक्त करण्यात त्यांना यश आलेले नाही. यामध्ये सुधारणा करावयाची असेल तर कोणी कोणत्याही पक्षाचे काम करावे मात्र शेतकऱ्यांसाठी एक व्हावे, हाच पर्याय आहे.
सध्या आयात होणाऱ्या कापसावर 11 टक्के शुल्क लावण्यात आले आहे. मात्र भारतीय कापूस उत्पादक अक्षरशः देशोधडीला लागला आहे. याविषयी कोणालाही सोयरे सुतक नाही. त्यासाठीच प्रहार संघटनेतर्फे आंदोलन केले जाणार आहे. त्यात सर्व घटकांनी सहभागी होणे आवश्यक आहे.
यावेळी माजी आमदार सुधीर तांबे हे देखील उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रहार संघटना आक्रमक होऊन आंदोलन करत आहे. मात्र ज्याच्यासाठी आंदोलन होते तो घटकच विस्कळीत आणि उदासीन आहे. त्याचा गैरफायदा सरकार घेते
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.