Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress News: `भाजप`ने वेगवेगळे दिन पाळण्यापेक्षा महागाई दिन पाळावा

Sampat Devgire

नाशिक : भाजप (BJP) सरकारला भडकलेली महागाई, बेरोजगारी अशी लोकोपयोगी कामे करण्यापेक्षा सुडाचे राजकारण करण्यातच अधिक रस आहे. त्यामुळेच विरोधी पक्षाच्या नेत्यांना (Oppositin leaders) अडकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सरकारने (BJP Government) वेगवेगळे दिन पाळण्यापेक्षा जनतेच्या रोजच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न बनलेला महागाई दिन पाळावा, असा उपरोधित सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आज दिला आहे. (BJP is completly busy in torchering oppositin leaders)

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे येत्या ९ ते १५ ऑॅगस्टदरम्यान क्रांतीवीरांच्या स्मरणार्थ ‘आजादी गौरव पदयात्रे’चे आयोजन केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात निघणा-या या पदयात्रेच्या पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी आज काँग्रेस पक्षातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. थोरात बोलत होते.

यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टिका करताना प्रचंड भाववाढ झाल्याकडे लक्ष वेधले. खाद्य पदार्थांवरील जीएसटीमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. थोरात यांनी १९४२च्या स्वातंत्र्यलढ्यातील नंदुरबार येथील शिरीषकुमारचे हौतात्म्य, १९३६ ला फैजपूर येथील काँग्रेसचे राष्टीय अधिवेशन याचा मागोवा घेत नगर येथील भुईकोट किल्ल्यात या पदयात्रेचा समारोप होणार असल्याचे सांगितले.

परकिय राजवटीत काँग्रेस पक्षाने अहिंसा, असहकार, सत्याग्रहाद्वारे एक संस्कृती निर्माण केली. स्वातंत्र्यानंतर शिक्षण, औद्योगिकीकरणातही पक्षाने मोठी झेप घेतल्याचे सांगितले. सोनिया गांधीच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाला प्रगतीपथावर नेले, परंतु सद्याच्या भाजप सरकारने जनतेचे जगणे अवघड केल्याचे सांगितले. सत्ताधाऱ्यांची जाणीव करून देणे हाच या देशव्यापी पदयात्रेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

संघाचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान नाही

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात रा. स्व. संघाचे योगदान काय0 असा प्रश्‍न श्री. थोरात यांनी उपस्थित केला. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला ओळख मिळालेली नाही तर पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव, डॉ. मनमोहन सिंग यांनीही देशाचा गौरव वाढविल्याचे त्यांनी सांगितले. महिन्यानंतरही मंत्रीमंडळ तयार होत नसल्याने दोन जणांच्या या सरकारला मंत्रालयातून नव्हे तर सचिवालातून कारभार करण्यात स्वारस्य असल्याचे श्री. थोरात यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, ज्येष्ठ नेते राजाराम पानगव्हाणे, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, माजी नगरसेवक राहुल दिवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT