Shirdi Politics Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirdi Politics : 7000 नव्हे, तर त्यापेक्षाही जास्त मतदार, सर्व मॅनेज केलं; प्रभावती घोगरेंच्या गंभीर आरोपांनं खळबळ

Congress Rahul Gandhi voters Shirdi Assembly Constituency Prabhavati Ghogare BJP Minister Radhakrishna Vikhe : राहुल गांधी यांच्यानंतर काँग्रेसच्या शिर्डी मतदारसंघातील विधानसभेच्या उमेदवार प्रभावती घोगरेंचा मतदार वाढीबाबत गंभीर आरोप केला आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत शिर्डीतील एका इमारतीत सात मतदार वाढल्याचा आरोपानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे.

भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी गांधींच्या आरोपांना जोरदार उत्तर दिलं असले तरी, काँग्रेसच्या शिर्डीतील विधानसभेच्या पराभूत उमेदवार प्रभावती घोगरे यांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. राहुल गांधी आणि प्रभावती घोगरे यांच्या आरोपानंतर पुन्हा एकदा बोगस मतदार नोंदणीची चर्चा सुरू झाली आहे.

प्रभावती घोगरे म्हणाल्या, "शिर्डी (Shirdi) विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नवमतदारांची नोंदणी केली गेली. हे सर्व मतदार बोगस होते.शिर्डी मतदारसंघातील लोणीतील मेडिकल कॉलेज, इंजिनियरिंग कॉलेज आणि सर्वच कॉलेजचे मुले मतदान करत होते". 7000 नव्हे, तर त्यापेक्षाही जास्त मतदारांनी मतदान केले आहे. हे सर्व मॅनेज केलं होते, असाही आरोप प्रभावती घोगरे यांनी केला.

प्रभावती घोगरे विधानसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघात भाजपचे (Congress) मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात लढल्या होत्या. त्यात त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी प्रभावती घोगरे यांनी अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केले होते. त्यातच राहुल गांधी यांनी राज्याच्या वाढलेल्या मतदानावर आरोप केला. शिर्डी मतदारसंघाचा संदर्भ देताना, तब्बल सात हजार मतदार वाढले कसे?, असा गंभीर प्रश्न संसदेत उपस्थित केला.

मंत्री विखे यांचा गांधींवर पलटवार

राहुल गांधी यांच्या आरोपानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. राहुल गांधी यांनी कुठलंही विधान करताना भान ठेवायला हवं, असा पलटवार भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. राहुल गांधींनी हा शोध कुठून लावलाय त्याचा शोध आता मी घेत आहे. भाजपाला मिळालेला जनादेश याचं दुःख विरोधी पक्षाला असून ज्यांनी जनाधार गमावला आहे, असेही मंत्री विखे यांनी म्हटले.

कुठही नियमाचा भंग नाही; तहसीलदार अमोल मोरे

राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपात कुठलंही तथ्य नाही. नवमतदार नोंदणी ही नियमाप्रमाणेच केली आहे. परराज्यातील (अस्थायी) विद्यार्थ्यांना प्राचार्य आणि वस्तिगृहाच्या पर्यवेक्षकाच्या दाखल्यानंतर मतदार ओळखपत्र देण्यात आली.एका इमारतीत राहणारांची इतक्या मोठ्या प्रमाणात नोंद केली गेली हा आरोप चुकीचा आहे. यात कुठही नियमाचा भंग नाही. अगोदरही हा आरोप झाला होता. तेव्हाच आम्ही अहवाल निवडणूक आयोगाला पाठवला आहे, असे तहसीलदार अमोल मोरे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT