Devendra Fadanvis & Chhagan Bhujbal
Devendra Fadanvis & Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आतुर झालेल्या फडणवीसांना अडीच वर्षे थांबावे लागेल!

Sampat Devgire

नाशिक : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्यात सत्ता येऊन पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी खुपच अधीर झालेले दिसतात. मात्र त्यासाठी त्यांना किमान अडीच वर्षे वाट पहावी लागेल. मुख्य म्हणजे सत्ता आली तरी त्यांचे पन्नास आमदार घटले आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा चिमटा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजप (BJP) नेते फडणवीसांना लगावला आहे. (Chhagan Bhujbal tweezers Devendra Fadanvis on government formation in maharashtra)

चार राज्यात भाजप सत्तेत आल्याने सध्या रोजच महाराष्ट्रातील सरकार जाणार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार अशी विधाने केली जात आहेत. याबाबत राज्याचे मंत्री भुजबळ यांनी आज नाशिक येथे भाजप नेत्यांना चांगलाच चिमटा घेतला. ते म्हणाले, राज्यात सरकार सरकार बदलाच्या चर्चा भाजप करीत आहे. त्यात नवे काय? महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून ते रोजच असे मुहुर्त सांगत आहे. त्यांचा एक तरी मुहुर्त प्रत्यक्षात आला का?.

भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सरकार स्थापन करणार या भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. राज्यात सत्तेत येण्याचे विधान ते सगळीकडे सर्व स्तरावर करतात. महाराष्ट्रात सध्या तरी महाविकास आघाडीचे स्थीर व मोठे बहुमत असलेले सरकार सत्तेत आहे. त्यामुळे राज्यात सत्ता येण्यासाठी त्यांना अडीच वर्षे थांबावे लागेल. ज्या बळावर ते ही विधाने करतात, त्याची वस्तुस्थितीही त्यांनी लक्षात ठेवावी. उत्तर प्रदेशात त्यांचे पन्नास आमदार घटले आहेत. तीथे विरोधकांत मोठी मतविभागणी झाली. त्याचा फायदा त्यांना झाला. सर्व विरोधक वेगळी भूमिका घेऊन, एकत्र येऊन लढले असते तर वेगळे चित्र दिसले असते. याचा अर्थ भाजपची लाट कमी होताना दिसते आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चार राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाचा काहीही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे लोक कसे निवडून येतील याबाबत आम्ही देखील प्रयत्न करू.

ओबीसी आरक्षण संदर्भात आयोग स्थापन केला आहे. त्यात भारतीय जनगणना आयुक्त, मुख्य सचिव राहिलेले बांठिया कार्यरत आहेत. त्यांच्या समवेत काही अनुभवी निवृत्त अधिकारी काम करीत आहेत. त्याचे काम सुरु झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत राज्यपालांकडे विनंती पत्र पाठविले आहे. विधानसभा अध्यक्षांची लवकर निवड करा असे राज्यपालांनीच आदेशीत केले होते. त्यामुळे राज्यपाल महोदय याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील तशा सूचना दिल्या आहेत.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT