Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde : मुख्यमंत्री होईपर्यंत वापरून घेतलं अन् नंतर...; ठाकरेंनी काय केलं ते शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Sunil Balasaheb Dhumal

Jalgaon Political News : बाळासाहेबांच्या विचारांसाठी उठाव केल्यानंतर 50 खोक्यांचा आरोप होत होते. मात्र शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून शिवसेना मोठी केली. शिवसेना मोठी करताना आमच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यावेळी ते घरात बसले होते. त्यांच्यावर एक तरी गुन्हा दाखवा आणि 50 खोक्यांचे बक्षीस मिळवा. मुख्यमंत्री होईपर्यंत ठाकरेंना एकनाथ शिंदेंची गरज होती. त्यानंतर त्यांनी काट्यासारखं मला बाजूला केले. त्यांनी कधीच कुणाला काहीही दिले नाही. दुसऱ्यांच्या खिशात हात घालून ते घेतच राहिले, असा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.

जळगावमधील मुक्ताईनगर येथील रावेर-मुक्ताईनगर पुलाच्या उदघाटन कार्यक्रमात शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली. ते म्हणाले, त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी माझी गरज होती. आमदार जुळवण्यासाठी मीच पुढाकार घेतला होता. त्यानंतर ते (उद्धव ठाकरे Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्यासाठी माझी गरज संपली. मला दिलेल्या खात्यातही ढवळाढवळ करू लागले. मला नाउमेद करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. मला काट्यासारखे बाजूला केले जात होते. मात्र त्यांनी मला ओळखले नाही. मी काटा नसून बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. त्यांचे विचार जागृत ठेवण्यासाठीच आम्ही उठाव केला, असेही शिंदेंनी ठासून सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खोक्यांचा आरोप कुणावर करता. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), चंद्रकांत पाटील, चिमणआबा, हा एकनाथ शिंदे काय आणि इतर लोक काय, या सर्वांनी शिवसेना मोठी केली. रक्ताचे पाणी केले. घरादारावर तुळशीपत्र ठेवले. बाळासाहेबांच्या सोबतीने शिवसेनेसाठी काम केले. जेल भोगले, केसेस आंगावर घेतल्या. त्यावेळी तुम्ही कुठे होता? त्यांच्यावर एकतरी केस दाखवा आणि 50 खोक्यांचे बक्षीस घ्या. तुम्हाला खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतात, असा निशाणाही शिंदेंनी (Eknath Shinde) ठाकरेंवर साधला.

आज बाळासाहेबांची शिवसेना, धनुष्यबाण आपल्याकडे आहे. बाळासाहेबांचे विचार आपल्याकडे आहेत. त्यांनी मात्र या शिवसेनकडे 50 कोटी मागणी करणारे पत्र दिले. ते पैसे शिवसेनिकांचे आहेत. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता सांगितले की त्यांना पैसेच पाहिजे तर देऊन टाका. त्यांना बाळासाहेबांचे विचार नकोत. ते फक्त पैशांचे धनी आहेत. बाळासाहेबांची संपत्तीच आमचे ऐश्वर्य आहे. ते टिकवण्यासाठीच उठाव केला, असेही शिंदेंनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT