Radhakrushn Vikhe-Patil- Balasaheb Thorat
Radhakrushn Vikhe-Patil- Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gram panchayat Result : बाळासाहेब थोरातांच्या आनंदावर विरजण; विखेंनी केला 'करेक्ट' कार्यक्रम

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar Gram panchayat Election Result : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येत आहे. यात महाविकास आघाडीसह भाजपच्या नेत्यांना धक्कादायक निकालांना सामोरे जात पराभव स्विकारावा लागला आहे. तर काही जणांनी आपल्या मतदारसंघतील ग्रामपंचायतीवरील वर्चस्व कायम राखले आहे. याचदरम्यान अहमदनगर जिल्ह्यातही दिग्गज नेत्यांना आपआपले गड राखण्यात यश आले आहे. पण यात बाळासाहेब थोरातांचाही (Balasaheb Thorat) समावेश आहे. पण त्यांच्या आनंदावर विरजण पडले असून भाजप नेते व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम केला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या. यातील 13 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या तर 190 ग्रामपंचायतची मतमोजणी आज पार पडते आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक नेत्यांनी आपले गड राखले आहे.. तर अनेकांच्या गडाला सुरूंग लागला आहे.

बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी म्हणून ओळखले जातात. या दोघांकडूनही कुरघोडीचे राजकारण सुरु असते. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याचं राजकारण हा राज्याच्या चर्चेचा विषय ठरत असतो. यामुळे ग्रामपंचायत निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. याठिकाणी आजी माजी महसूलमंत्र्यांचे गट आमने सामने उभे ठाकले होते. यात संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीपैकी आत्तापर्यंत थोरात गटाने 25 ठिकाणी आपली सत्ता कायम राखली. तर थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखेंनी थोरातांच्या सत्तेला सुरूंग लावत आठ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा रोवला आहे.

बाळासाहेब थोरात यांचे मूळगाव असलेल्या जोर्वे गावात देखील इतक्या वर्षांची सत्ता उलथवत भाजपने बाजी मारली आहे. हा थोरातांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विखे पाटील गटाने खेचून नेल्याने गड आला पण सिंह गेला अशी थोरात गटाची अवस्था झाली आहे..

संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतवर विखे पाटील समर्थक असलेल्या इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई सरपंच झाल्या आहेत.. राहाता तालुक्याचा आपला गड विखेंनी राखला असून सर्वच्या सर्व 12 ग्रामपंचायतवर आपला झेंडा रोवलाय..

ठाकरे गटात असलेले माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी आपली ताकद दाखवून देत नेवासा तालुक्यातील सर्वच्या सर्व 13 ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे . अजूनही जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतमोजणी सुरू असून दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT