Kirit-Somaiya.jpg Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kirit Somaiya Politics: मालेगावातून एक हजार बांग्लादेशी पळाले! किरीट सोमय्या यांनी गृहखात्यालाच घेरले?

Kirit Somaiya; Somaiya search Bangladeshi and Rohingya why not police-किरीट सोमय्या यांनी मालेगावातून एक हजार बांग्लादेशी नागरिक पळाल्याचा दावा केला.

Sampat Devgire

Kirit Sommaiya News: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मालेगाव शहरातील नागरिकांबाबत गंभीर विधान केले आहे. या शहरात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य दाखले दिले गेले आहेत. हे दाखले बांगलादेशी नागरिकांना दिल्याचा त्यांचा आरोप आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांचे विशेष तपास पथक मालेगाव शहरात घरोघरी जाऊन तपासणी करीत आहे. त्यांना अद्याप एकही बांग्लादेशी नागरिक सापडला नाही. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या थेट संख्या आणि यादीच देतात. त्यांच्या होणाऱ्या दौऱ्याने आता पोलिस आणि प्रशासन देखील तणावात आहे.

मुंबईत बसून किरीट सोमय्या मालेगावातील बांग्लादेशी आणि रोहिंग्या नागरिक शोधतात. त्यांच्याकडे असे कोणते कौशल्य आहे जे, पोलिसांकडे नाही. सोमय्या अवैध बांग्लादेशी नागरिक शोधू शकतात तर, पोलीस का नाही असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

मालेगाव येथे माजी खासदार सोमय्या यांनी गुरुवारी पुन्हा एकदा भेट दिली. यावेळी त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक तेकबीरसिंग संधू, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त रवींद्र जाधव तहसीलदार विशाल सोनवणे यांच्याशी चर्चा केली. बनावट पुराव्यांच्या आधारे देण्यात आलेले सर्व दाखले संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी बनावट दाखल्यांच्या तपासा संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली. संशयास्पद रित्या देण्यात आलेल्या चार हजार दाखल्यांपैकी किमान एक हजार दाखले बनावट आहेत. हे एक हजार दाखले बांगलादेशी नागरिकांचे असावेत. हे बांगलादेशी नागरिक पोलिसांच्या मोहिमेमुळे शहर सोडून पळून गेले, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे एक प्रकारे त्यांनी आपल्याच सरकारला घेरले आहे.

तत्पूर्वी माजी खासदार सोमय्या यांनी संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड येथे भेट दिली. या तहसीलदार कार्यालयातून मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांना दाखले दिल्याचा दावा त्यांनी केला. संभाजीनगर जिल्ह्यात दहा हजार तर एकट्या सिल्लोड जिल्ह्यात चार ७३० बांग्लादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम असल्याचा दावा त्यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून सोमय्या यांनी बांग्लादेशी नागरिक आणि रोहिंग्या हा विषय हाती घेतला आहे. यामध्ये सातत्याने त्यांनी मालेगावला टार्गेट केले आहे. त्यामुळे त्यांची ही मोहीम चर्चेत आहे. सोमय्या यांनी अनेकदा आरोप केले आहेत. मात्र तसे वास्तवात काहीच आढळलेले नाही.

-------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT