Manoj Jarange Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange : जरांगेंच्या विधानानं मराठा समाज हळहळला; 'शरीर कधी धोका देईल, सांगता येत नाही' ...पाहा VIDEO

NCP Chagan Bhujbal Manoj Jarange Nashik Maratha community : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक इथल्या बालेकिल्ल्यातू मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला भावनिक साद घातली आहे.

Pradeep Pendhare

Nashik News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणासाठी संघर्ष उभारणारे मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात नाशिकमध्ये मोठे भावनिक विधान केलं आहे.

"आरक्षणासाठी कोणीही आडवं आलं, तर सोडायचे नाही. मी कधी जाईल माहीत नाही, शरीर साथ देत नाही, शरीर कधी धोका देईल, हे सांगता येत नाही", असे खळबळजनक विधान मनोज जरांगे यांनी केले आहे. मनोज जरांगे यांच्या या भावनिक विधानामुळे मराठा समाज हळहळला आहे.

मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) गेल्या दीड वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षाला लोकसभा निवडणुकीपूर्वी चांगलीच धार आली. लोकसभेला सत्ताधाऱ्यांना मराठा आरक्षणाच्या फटक्याला समोरे जावे लागले. त्यातून सत्ताधारी आता सावध झाले आहे. मनोज जरांगे यांना रोखत आहेत. परंतु जरांगे यांचा संघर्ष कायम आहे.

मराठा आरक्षणाला जो कोणी पाठिंबा देणार नाही, त्याला या निवडणूक पाडा, असा आदेशच मनोज जरांगे यांनी काढला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जरांगे यांचा पाठिंबा मिळवण्याची चढाओढ सुरू आहे. यातच मनोज जरांगे यांनी विधानसभेच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस राहिले, असतानाच आता थेट लोकांमध्ये घुसले आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात येणाऱ्यांना पाडा, असे म्हणत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांचे टेन्शन वाढले आहे.

जरांगे नेमकं काय म्हणाले

नाशिक (Nashik) इथं मनोज जरांगे यांनी समाजाला भावनिक साद घातली. जरांगे यांनी ही साद घालताना खळबळजनक विधान केले. ते म्हणाले, "आरक्षणाला आडवा येणाऱ्याला सोडू नका. जात कधीच तुटू देऊ नका. आरक्षणाला आडवा येणाऱ्याला निवडणुकीत पाडा. माझी जात कधीच तुटू देऊ नका. जबाबदारी घ्या. तुमच्या किती दिवस राहील हे सांगता येत नाही. मी कधी जाईन माहीत नाही, शरीर साथ देत नाही. शरीर कधी धोका देईल, हे सांगता येत नाही. उपोषण कठोर केले आहेत .त्यामुळे शरीर साथ देत नाही".

सत्ताधारी, विरोधक सैरभैर

विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान होत आहे. त्यात मनोज जरांगे यांनी नाशिक इथून समाजाला भावनिक आवाहन केले आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. जरांगे यांची ही भावनिक साद मराठा समाजाने मनावर घेतल्यावर त्याचे पडसाद निवडणुकीत उमटू शकतात. मराठवाड्यात मनोज जरांगे यांचा फॅक्टरचा प्रभाव आहे. यातच मनोज जरांगे यांचे मंत्री छगन भुजबळ यांच्याशी आरक्षणावरून झालेल्या द्वंद सर्वश्रुत आहे. त्यामुळे जरांगे यांच्या भावनिक सादचे काय पडसाद उमटतात आणि त्यावर सत्ताधारी, विरोधक कशी मात करतात, याकडे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT