Nana Patole Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nana Patole : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका; सरकारने तातडीने मदत देण्याची पटोलेंची मागणी

Ganesh Thombare

Nashik News: अवकाळी पावसामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील सोमवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत याबाबत स्थानिक पदाधिकारी व लोक्रतिनिधींशी चर्चा केली. गरज पडल्यास नाशिकचा दौरा करू, असे ते म्हणाले.

पटोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला. या नुकसानासंदर्भात सरकारने तातडीने मदत करावी, याआधी पाऊस न झाल्याने शेतीचे नुकसान झाले होते. जिल्ह्यात टंचाई आहे. त्यामुळे तातडीने आढावा घेऊन सरकारला अहवाल पाठवावा, योग्य भरपाई देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पटोलेंनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत काँग्रेसचे पदाधिकारी सरकारबरोबरदेखील पत्रव्यवहार करणार आहेत. मुंबई येथील काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची आढावा बैठक पटोले यांच्या उपस्थितीत पार पडली. या वेळी प्रदेशाध्यक्षांना स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चांदवड तालुक्यात झालेली गारपीट, बेमोसमी पाऊस व दुष्काळ या संदर्भात माहिती दिली.

त्यानंतर झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्याबाबतीमध्ये काय उपापयोजना करता येतील, यासाठी त्यांनी नाशिक जिल्हाधिकारी यांच्याशी फोन वरून संपर्क साधून सूचना केल्या. या वेळी राज्यातील सर्व तालुकाध्यक्ष व विविध पदाधिकारी उपस्थित होते, असे चांदवड बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT