Ahilyanagar News : उमेदवारी मागे घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना अहिल्यानगरमध्ये धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनसेचे दोन उमेदवार मागील 24 तासांपासून संपर्काच्या बाहेर आहेत. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांचे अपहरण झाले असावे, असा संशय मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केला आहे. या प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये देखील धाव घेतली आहे.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रबळ उमेदवारांनी मनसेच्या उमेदवारांचे अपहरण केल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 17 उमेदवार राहुल जाधव आणि अंबरनाथ बालसिंग असे गायब झालेल्या मनसेच्या उमेदवारांची नावे आहे.
एका ठिकाणी भाजप तर दुसऱ्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात हे उमेदवार उभे राहिले होते. केडगाव या संवेदनशील भागातील हे दोन उमेदवार असल्याने मनसेचे कार्यकर्ते देखील चिंतेत आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार निवडणुकीच्या आधीच बिनविरोध विजयी झाले आहेत. प्रभाक क्रमांक आठमधून कुमार वाकळे तर प्रभाग 14 मधून प्रकाश भागानगरे हे विजयी झाले आहेत,
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.