Maharashtra Congress leaders : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना राहुल गांधी यांना एक तासात भेटून दाखवायचं चॅलेंज दिलं.
काँग्रेसच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त करतानाच, काँग्रेस देशातला विचार आहे. तो संपणार नाही आणि त्याची गरज देखील आहे. काँग्रेसच्या भवितव्याविषयी चिंता असतानाच, राहुल गांधी अॅक्सेसेबलच नाहीत, असा दावा देखील सत्यजीत तांबे यांनी केला.
आमदार सत्यजीत तांबे यांच्या परिवारात काँग्रेसचा विचार आहे. सत्यजीत तांबे युवक काँग्रेसचा अध्यक्ष होते. जिल्हा परिषदेचे दहा वर्षे सदस्य देखील होते. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे जवळेच सहकारी म्हणून सत्यजीत तांबे यांची महाराष्ट्रात युवा नेता म्हणून ओळख होती. महाविकास आणि महायुतीच्या राजकारणात नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी काँग्रेस विचाराधारेच्या तांबे परिवाराभोवती महाविकास आघाडीच्या निमित्ताने पक्षातंर्गत राजकीय वादळ उभं झालं.
सत्यजीत तांबे आणि त्यांचे वडील माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे यांचं निलंबन झालं. यानंतर सत्यजीत तांबे वडील सुधीर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पदवीधर निवडणुकीला अपक्ष समोरे गेले. तेव्हापासून सत्यजीत तांबे काँग्रेसपासून (Congress) काहीसे दूर झाले. सत्यजीत तांबे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना काँग्रेसच्या भवितव्यावर चिंता व्यक्त केली. राहुल गांधींना दिल्लीत मोजक्यात 'चांडळ चौकडी'नं घेरल्याचा दावा केला.
सत्यजीत तांबे म्हणाले, "राहुल गांधी अॅक्सेसेबलच नाहीत. पंजाबमध्ये त्यावेळी भारत जोडो यात्रा सुरू होती. त्यावेळी त्यांना संपर्क केला. तिकडून प्रतिसाद मिळाला नाही. निवडणुकीनंतर संपर्क झाला. भेटायला बोलवलं, भेटायला गेलो. पण भेटून दिलं नाही. माझ्या वडिलांनी तीन वेळा पत्र लिहिलं. वडील देखील काँग्रेसमधून निलंबित आहेत. माझ्या वडील तर हार्ड कोअर काँग्रेसी आहेत. त्यांच्या रक्ता रक्तात काँग्रेस आहे. त्यांनी तीनदा पत्र लिहून माझ्यावरचं निलंबन मागे घ्यावा, अशी मागणी केली. त्याचंही काही झालं नाही. यातून असे दिसते की, अॅक्सेसेबल नाही. हाच मोठा 'ड्रॉ-बॅक' आहे".
'मी छातीठोक पणे सांगतो की, महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांनी एक तासांच्या आत राहुल गांधी यांना भेटायला जाऊन दाखवावं, कोणत्याही नेत्यानी, प्रदेशाध्यक्षांसह कुणीही, एकतासांत, फोनवर बोलून दाखवावं, आणि असं जर नेतृत्व असेल, मग कोणाच्या भरवशावर लढाई लढायची आणि कोणाच्या भरवशावर कोणाची बाजू घ्यायची', असे प्रश्न सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केले.
राहुल गांधी यांच्याबाबत हा दावा करताना, ही माझी टीका नव्हे, ती करू पण शकत नाही, अतिप्रेमापोटी, त्रागापोटी बोलतो हे मी बोलतो आहे, कारण त्या संघटनेवर माझं प्रेम आहे. पुढे माझी राजकीय भूमिका बदलेल. पण याचा अर्थ ज्यांनी मला ओळख दिली, संधी दिली, मित्रपरिवार दिला, जो माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे, त्या संघटनेविषयी कृतघ्न होणं माझ्या रक्तात नाही, असेही सत्यजीत तांबे यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.