Nashik-Mumbai News : येत्या आठवड्यात नाशिक-मुंबई महामार्गावरील पन्नास टक्के वाहतूक कमी होईल. त्यामुळे नाशिक, मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी केला आहे. (Traffic police will take action on Heavy traffic management)
नाशिक-मुंबई (Mumbai) महामार्गावरील (Highway) कल्याण, ठाणे बायपास परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री (Eknath Shinde) तसेच पोलीसांनी (Police) पुढाकार घेतला आहे.
याबाबत मंत्री भुसे काल नाशिक येथे म्हणाले, नाशिक- मुंबई महामार्गावर खड्डे पडले आहेत. अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यावर प्रशासकीय स्तरावर देखील दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यात लक्ष घातले. त्यामुळे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लवकरच त्यावर निश्चित तोडगा निघेल.
ते म्हणाले, येत्या दोन दिवसात याबाबत मी स्वतः बैठक घेत आहे. त्यात वाहतूक कोंडीची समस्या व त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेतला जाईल. लवकरात लवकर खड्डे बुजवण्याचे प्रयत्न आहेत. या महामार्गावर अनेक कट होते. त्यामुळे देखील वाहतूक कोंडी होत होती.
या महामार्गावरील अडचणींबाबत वाहतूक पोलीस, महामार्ग विभागाने माहिती दिली. त्यात बावीस कट होते. ते आम्ही आता बंद केले आहेत. पोलीस याठिकाणी आता विशेष लक्ष देत आहेत. येणाऱ्या आठ दिवसात पन्नास टक्के तरी वाहतूक कमी होईल.
श्री. भुसे पुढे म्हणाले, रस्त्याचे काम सुरळीत होईपर्यंत टोल बंद करायचा की नाही, याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल, कारण हा विषय त्यांच्या अखत्यारीतील आहे. दरम्यान याबाबत ठाणे पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी एक अध्यादेश काढला. त्यात पहाटे पाच ते मध्यरात्री १२ या काळात अवजड वाहतूक बंद करण्याचा अध्यादेश काढला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.