Anna Hazare  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anna Hazare : 'नाक दाबलं की तोंड उघडतं', पाकिस्तानविषयी अण्णा हजारे नेमकं काय म्हणाले?

Anna Hazare supports Indus Water Treaty suspension after Pahalgam attack : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बऱ्याच दिवसानंतर कॅमेऱ्यासमोर येऊन पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर आपलं मत मांडलं आहे. अण्णा हजारे यांनी सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

Ganesh Sonawane

Pahalgam attack : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. भारताने पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले आहे. यात सिंधू जल कराराला स्थगिती देण्याचा निर्णय भारताने घेतल्याने पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. खिशात दमडी नसताना पाकिस्तानकडून युद्धाच्या वल्गना केल्या जात आहेत. तर दुसरीकडे, भारत काही तरी मोठं करण्याची धास्ती पाकिस्तानला वाटत आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सगळ्या देशात संतापाचे वातावरण आहे. पाकिस्तानबद्दल राग व द्वेष आहे. भारतातील हिंदू-मुस्लीम बांधव एकजुटीने देशासोबत उभे आहेत. पाकिस्तानला धडा शिकवायला हवा अशी प्रत्येक भारतीयाची भावना आहे. अशातच आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बऱ्याच दिवसानंतर कॅमेऱ्यासमोर येऊन पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर आपलं मत मांडलं आहे. अण्णा हजारे यांनी सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयाच समर्थन केलं आहे.

अण्णा हजारे म्हणाले की, "सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पर्यटकांवर हल्ले करणे हा सगळ्यात मोठा दोष आहे. ते पर्यटक आहेत. ते तुमच्या हिंदुस्थान किंवा पाकिस्तान येथून आलेले नाहीत. त्यांचा संबंध नाही. त्यांच्याशी संबंध लावणं हे योग्य नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंधू नदीचे जर पाणी थांबल तर नाक दाबलं की तोंड उघडतं अशी म्हण आहे. त्यामुळे नाक दाबलं की तोंड आपोआप उघडेल, म्हणून ही कृती करणं गरजेचं आहे' असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

अण्णा हजारे पुढे म्हणाले की, काही देशविरोधी शक्ती आहेत त्यांना भारतातील शांतता व एकोप्याचे वातावरण बघवत नाही. म्हणूनच ते अशा खोडसाळ आणि क्रूर कृत्यांना प्रवृत्त होतात. अशा घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. मात्र, आपण घाबरून जायचं नाही. देशाने एकत्र येऊन अशा हल्ल्यांचा विरोध करायला हवा असं आवाहन आण्णा हजारे यांनी केलं आहे.

अण्णा हजारे हे माजी सैनिक आहेत. अण्णा हजारे भारतीय लष्करात होते. यावेळी बोलताना आण्णा हजारे यांनी 1965 साली भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणीही सांगितल्या. ते म्हणाले, भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी मी काश्मीरमध्ये होतो. आमच्या सैन्यतुकडीवर पाकिस्तानी लढवय्या विमानांनी हल्ला केला होता. त्यात आपले अनेक जवान शहीद झाले होते. माझ्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली होती असे त्यांनी सांगितले. देशासाठी अनेक जवांनानी आजवर बलिदानाची आहुती दिली आहे. आजही अशा देशविरोधी शक्तींविरोधात लढण्यासाठी आपले सैनिक सज्ज आहेत. त्यांच्यावर संपूर्ण देशवासियांचा विश्वास असल्याचं आण्णा हजारे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT