Pakistan-Origin Women Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pahalgam Terror Attack : 'त्या' सहा पाकिस्तानी महिला अजूनही नाशिकमध्येच, काय कारण?

Pakistani Women Nashik : पहलगाम हल्ल्यानंतर शहरातील पाकिस्तानी नागरिकांची शोध मोहीम घेण्यात आली होती. त्यात सहा पाकिस्तानी महिला आढळून आल्या होत्या. त्यांना अद्याप पाकिस्तानात पाठविण्यात आलेले नाही.

Ganesh Sonawane

Pahalgam terror attack : पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर निर्णय घेतले. भारताने सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करत त्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम भारताने दिला होता. त्यानंतर आतापर्यंत बहुतांश पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडला आहे. नाशिकमध्येही सहा पाकिस्तानी महिलांचे वास्तव्य आढळून आले होते. मात्र अद्याप 'त्या' सहाही महिला शहरातच असल्याची माहिती समोर आली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर शहरातील पाकिस्तानी नागरिकांची शोध मोहीम घेण्यात आली होती. त्यात सहा पाकिस्तानी महिला आढळून आल्या होत्या. शहरात आढळून आलेल्या या सहा'ही पाकिस्तानी महिलांचे मागील २५ वर्षांपेक्षाही अधिक काळापासून भारतात वास्तव्य आहे. या सहा महिलांकडे दीर्घकालीन व्हिसा आहे. त्यामुळे त्यांना पाकिस्तानात पाठविण्याचा कोणताही आदेश अद्यापपर्यंत पोलिस प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या महिलांचा नाशिकमधील मुक्काम कायम आहे.

भारत हे त्यांचे सासर तर पाकिस्तान हे माहेर आहे. या सहा महिलांची वाटचाल आता उतारवयाकडे सुरू झाली असून त्यांची मुले-मुलीदेखील मोठी झाली आहेत. त्यांचा माहेरातील सगळा गोतावळा पाकिस्तानमध्ये आहे. या सहा महिलांना भारताचे नागरिकत्व अद्याप मिळालेले नाही. त्यांच्याकडे पाकिस्तानचे नागरिकत्व आहे. मात्र त्यांच्याकडे दिर्घकालीन मुदतीसाठी वास्तव्याचा व्हिसा असल्याने त्यांना अद्याप पाकिस्तानात पाठविण्यात आलेले नाही.

या महिला स्वत: पाकिस्तानी असल्या तरी त्यांनी लग्न भारतीय व्यक्तींसोबत केलेलं असल्याने त्या नाशिक शहराच्या सुना आहेत. शिवाय वर्षानुवर्ष ते इथेच राहतात. त्यांच्या मुलांचा जन्म भारतीय असल्यामुळे ती भारतीय असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिस प्रशासन व फॉरिन रजिस्ट्रेशन कार्यालयाकडून वरिष्ठ स्तरावर या सहा महिलांची माहिती कळविण्यात आल्याचे आयुक्तालयाच्या सूत्रांनी कळविले आहे.

अशाप्रकारे वास्तव्य करणाऱ्या महिलांबाबत कायद्यात काही स्पष्ट तरतुदी आहेत. अशा नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना, आधार कार्ड, मतदान कार्ड मिळत नाही. मात्र, प्रदीर्घकाळ वास्तव्य असल्याने कौटुंबिक माहिती सादर करुन वास्तव्याचे नूतनीकरण करणे शक्य आहे. यासाठी केंद्राच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे अर्ज करावा लागतो. मात्र क्लिष्ट व वेळखाऊ स्वरुपाची ती प्रक्रिया आहे. संबधितांना भारताचे नागरिकत्वही मिळू शकतं मात्र त्यासाठी काही प्रक्रिया असतात ज्या पूर्ण कराव्या लागतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT