Raju Shetty Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raju Shetty Politics: राजू शेट्टी आक्रमक होताच केंद्र सरकार हालले, चार दिवसांत मिळणार कांदा उत्पादकांना पैसे!

Raju Shetty allegations of corruption against NAFED & NCCF agencies: कांदा खरेदीतील भ्रष्टाचाराबाबत ‘एनसीसीएफ’, ‘नाफेड’ संस्थांची चौकशी करून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

Sampat Devgire

Raju Shetty News: केंद्र शासनाच्या संस्थांनी कांदा ग्राहकांसाठी दर स्थिरीकरणाच्या नावाखाली दलालांचे भले केले आहे. कांदा उत्पादक शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे नाफेडसह अन्य यंत्रणांचा कांदा खरेदी भ्रष्टाचारात मोठा हात आहे.

या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण यांना पत्र लिहिले आहे. किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत ३ लाख टन कांद्याची खरेदी ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन संस्थांनी नोडल एजन्सीच्या माध्यमातून केली. त्यात मोठा गैरव्यावहार झाल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

या कांदा खरेदीपोटी शेतकऱ्यांची दोनशे कोटी रुपयांची बिले गेल्या दोन महिन्यापासून अदा करण्यात आली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे तातडीने व्याजासह अदा करावे. तसेच या खरेदीमधील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून सरकारने श्वेतपत्रिका काढावी या प्रमुख मागण्या शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केल्या आहे.

यासंद्रभात माजी खासदार शेट्टी म्हणाले, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात बफर स्टॉक करण्यासाठी कांदा खरेदी झाली. खरेदी होऊनही शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण गंभीर आहे. त्यासाठी माजी खासदार शेट्टी यांनी केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव देवेश चतुर्वेदी यांची सोमवारी कृषी भवन येथे भेट घेतली.

‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ संस्थेच्या माध्यमातून झालेल्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याच्या तक्रारी आहेत. याआधीही या संस्थांनी कांदा खरेदीत घोटाळे केले आहेत. मात्र त्या गैरप्रकारांवर संस्थांशी संबंधीत यंत्रणांनी पांघरून घातले. सध्याच्या खरेदीतील घोटाळा मात्र अधिकारी व शेतकरी सहकारी उत्पादक कंपन्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकरी त्याचा बळी ठरला.

शेतकऱ्यांना कांदा आपले पैसे मिळावेत यासाठी खरेदीदारांचे उंबरे झिजवावे लागत आहे. यामुळे ’नाफेड’, ’एनसीसीएफ’ तसेच उत्पादक कंपन्या यांनी केलेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करून श्वेतपत्रिका काढावी. यानिमित्ताने खतांचे लिकींग करणाऱ्या कंपन्यांचे अनुदान थांबविण्याची मागणी देखील शेट्टी यांनी केली. कृषी सचिव चतुर्वेदी यांनी तातडीने ’नाफेड’च्या कार्यकारी संचालकांना चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याच्या सुचना दिल्या.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT