Eknath Khadase
Eknath Khadase Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

पूरस्थिती पाहून खडसे म्हणतात, संपूर्ण महाराष्ट्र वाऱ्यावर...

सरकारनामा ब्युरो

जळगाव - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे. राज्यात शिवसेना बंडखोर व भाजपचे सरकार आले आहे. मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोनच जण आहेत. राज्यात नैसर्गिक आपत्ती सुरू आहेत. त्यावरून राज्यातील प्रशासकीय स्थितीवर आमदार एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांनी भाष्य केले. ( Seeing the flood situation, Khadse says, the entire Maharashtra is in the wind... )

एकनाथ खडसे म्हणाले, राज्यातील संकटाच्या काळात सरकारने मदत करायला पाहिजे. मदतीची घोषणा करायला हवी. पूरग्रस्तांना पूर्वी मदत केली जायची. सध्या संपूर्ण महाराष्ट्र वाऱ्यावर आहे. प्रशासनावर जबाबदाऱ्या सोपवून दिल्या आहेत. मंत्री नसल्याने कामे व्यवस्थित होत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधी हा सामान्य जनतेची बाजू प्रभावीपणे मांडू शकतो. अधिकारी हे नेहमी प्रमाणे नियमांच्या चौकटीत असतात, त्यामुळे त्यांना मर्यादा आहेत. नियमांत अनेक त्रुटी आहेत. ते नियम लोकप्रतिनिधीच सांगू शकतो. मात्र राज्यात मंत्री नसल्याने ही स्थिती ओढावली आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील काही भागांत मागील 15 दिवसांपासून अतिवृष्टी व पूराचे संकट आहे. आजपासून 29 जुलैपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मात्र अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही. राज्यातील काही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT