Sadabhau Khot
Sadabhau Khot Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ओबीसी आरक्षण तिघाडी सरकारनेच घालवले!

Sampat Devgire

चाळीसगाव : ओबीसी (OBC) समाजाचे राजकीय आरक्षण (Political reservation) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सरकारनेच घालवले असल्याचे आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला. ‘जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा' या अभियानानिमित्त ते चाळीसगाव येथे बोलत होते.

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा अभियान २९ एप्रिलपासून कोकणातील सिंधुदुर्ग येथून सुरू झाले आहे. हा दौरा २१ जिल्हा पूर्ण केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सांगता करण्यात येणार आहे. तत्पूर्वी हा दौऱ्यात ते चाळीसगावला आले होते.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या शिवनेरी निवासस्थानी दौऱ्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर पत्रपरिषद घेण्यात आली. यावेळी कोरोनाच्या काळात इतरांपेक्षा शेतकरी, कामगार व बारा बलुतेदार यांना जबर फटका बसला. हातातले कामे ठप्प झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली. बहुतेकांनी आपली जीवन यात्रा संपवली. या काळात कष्टकरी कामगारांना सरकारच्या मदतीची गरज होती. परंतु हे सरकार प्रबोधन करण्यातच मग्न होते असे ते म्हणाले.

राज्यात टिईटी, पोलिस व आरोग्य भरतीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला. हे राज्य सरकारचे अपयश असल्याचे सांगून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण या सरकारनेच घालवून दिल्याचे आरोप माजी मंत्री खोत यांनी केले.

याप्रसंगी भाजपचे के. बी. साळुंखे, तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, चंद्रात्रे बाबा, माजी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, आनंद खरात, दिनेश बोरसे, नगरसेवक संजय पाटील आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT