Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बूंधूनी एकत्र यावं ही शिवसेना व मनसे अशा दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पहिल्या पासून इच्छा आहे. परंतु केवळ स्थानिक नेत्यांच्या मनात असून काही उपयोग नाही. त्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये एकमत होणे आवश्यक आहे. त्याचीच वाट स्थानिक नेते बघून असताना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्दव ठाकरे यांची नुकतीच मातोश्रीवर भेट झाली. तसे मागच्या तीन महिन्यात दोन्ही ठाकरे बंधूंची पाच वेळा भेटी झाल्या आहेत. पण, यावेळची मातोश्रीवर रविवारी पार पडलेली भेट म्हणजे राजकीय भेट होती अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. नाशिक महापालिकसेह एकुण पाच महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंचे युती बाबत एकमत झाल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन युतीची घोषणा करतील असं राऊत यांनी म्हटल्याने पुन्हा एकदा नाशिकमधील मनसे व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. याआधीही दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या कार्यालयात जाऊन मनोमिलनाचे दर्शन घडवले आहे. नाशिकमध्ये मनसे -शिवसेनेचा संयुक्त मोर्चा व आंदोलनेही झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
दोन्ही पक्षांचे मूळ आणि कुळ एकच असल्याने यापुढे शिवसेना व मनसेचे सर्व कार्यक्रम संयुक्तपणे होतील असंही संजय राऊत यांनी सांगितलं होतं. शिवसेनेकडून युतीचे पूर्ण संकेत मिळत असताना मनसेकडून मात्र ते मिळत नव्हते. पंरतु राऊतांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही बंधूंचे नाशिकबाबत एकमत झाले असल्यास नाशिकमधील गणिते बदलू शकतात. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपच्या शंभर प्लसच्या घोषणेलाही धोका निर्माण होऊन भाजप गपगुमान महायुती म्हणून निवडणुकीची घोषणा करु शकते.
भाजप व शिवसेना शिंदे गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पाडत पक्षाचे अनेक नेते गळाला लावत त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. असे असले तरी ठाकरे गटाचे तसे बऱ्यापैकी संघटन आजून नाशिकमध्ये टिकून आहे. नाशिक हा मनसेचा एकेकाळी बालेकिल्ला होता. त्यामुळे निश्चितच महायुतीला टक्कर जरी देऊ शकले नाही तरी जागांचे गणित दोन्ही पक्ष एकत्र आल्यास बिघडवू शकतात.
गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये भाजपने नाशिक महापालिकेत निर्विवाद सत्ता मिळवली होती. 122 पैकी भाजपने 67 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेना 34 जागा मिळवत दुसऱ्या स्थानावर आली होती. मात्र मनसेला केवळ 5 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. परंतु दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास दोघांना एकमेकांचा फायदा होऊ शकतो. भाजपला टक्कर देऊ शकले नाही तरी जागा कमी होण्याच्या भीतीने भाजपला स्वबळाचा विचार न करता महायुतीचा विचार करावा लागू शकतो. तर मनसे व शिवसेना (उबाठा) युती झाल्याच दोनच पक्ष असल्याने जागावाटप समसमान करता येईल, त्यामुळे काही वादाचा विषय देखील राहणार नाही असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.