Ravikant Tupkar after bail. Sarkarnama
विदर्भ

Protest For Farmer : कोर्टाने पोलिसांना पुन्हा फटकारले, रविकांत तुपकर यांना...

जयेश विनायकराव गावंडे

Buldhana : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई-दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रोखू, असा इशारा शेतकरीनेते रविकांत तुपकरांनी दिला होता. त्यामुळे आंदोलनाच्या एक दिवस आधीच बुलढाणा पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी केलेली ही अटक बेकायदेशीर ठरवत न्यायालयाने रविकांत तुपकर यांची जामिनावर सुटका केली आहे. जामीन मिळाल्यानंतर तुपकरांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यापुढचे आंदोलन हे सरकार हादरवून सोडणारे असेल, असे तुपकर म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून शेतकरीनेते रविकांत तुपकर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना दिसत आहेत. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव, तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांच्याकडून 19 जानेवारीला मुंबई-दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तुपकरांना नोटीस दिली. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी तुपकर भूमिगत झाले होते.

बुलढाणा पोलिसांनी त्यांना राजुरा घाटात अटक केली. बुलढाणा येथील न्यायालयात तुपकर यांना हजर करण्यात आले. यावेळी गुन्हा केलाच नाही, त्यापूर्वी अटक कशी करण्यात आली, अशी भूमिका वकिलांनी न्यायालयात मांडली. न्यायालयाने रविकांत तुपकर यांची अटक ही बेकायदेशीर असल्याचे ठरवत त्यांना जामीन मंजूर केला.

जामीन मिळाल्यानंतर रविकांत तुपकर यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता शेतकऱ्यांसोबत बैठक घेत पुढचे आंदोलन ठरवतो, असे तुपकरांनी म्हटले. सरकार पोलिसांना पुढे करून शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळविण्याच्या प्रयत्नात आहे. शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. मात्र पोलिस ते आंदोलन दडपत आहेत. शेतकऱ्यांनी कुठे न्याय मागायचा, असा सवालही तुपकरांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुरुंगात असल्याने कार्यकर्त्यांकडून आंदोलनाचा प्रयत्न झाला. मात्र त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतरच आंदोलन हे सरकारला हादरवणारे असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. येणाऱ्या काळात तुपकर पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. पुढे काय आंदोलन करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून तुपकर हे शेतकऱ्यांसाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनांमुळे चर्चेत आहेत.

मंत्रालय ताब्यात घेण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यावेळीही पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना फटकारत तुपकर यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या मूळ गावी अन्नत्याग आंदोलन केले होते. मंत्रालयाकडे निघण्यापूर्वीच तुपकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी बोलावून घेतले होते. केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांच्याशीदेखील तुपकर यांनी चर्चा केली होती.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT