Vijay Wadettiwar  Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar : 'मी आज जाणार नाही, उद्या मात्र खात्री नाही'; भुजबळ-फडणवीसांच्या मैत्रीवर वडेट्टीवार यांचा टोला

Congress Vijay Wadettiwar DCM Ajit Pawar NCP Chhagan Bhujbal CM Devendra Fadnavis BJP : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या मैत्रीवर मोठी प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य तथा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढलेली मैत्रीची सध्या जोरदार चर्चा आहे. छगन भजुबळ यांचा कोणताही शब्द मुख्यमंत्री फडणवीस टाळत नाही, यावरून काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे.

'मी आज जाणार नाही, उद्या मात्र खात्री नाही', असा खोचक टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. वडेट्टीवार यांच्या या टोलेबाजीने छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे.

महायुती (Mahayuti) सरकार शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय घेणार, असल्याची चर्चा आहे. तशा बातम्या देखील समोर आल्या आहेत. लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याच्या आर्थिक तरतुदींसाठी महायुती सरकारने हे पाऊल उचलणार असल्याचे सांगितले जात आहे. निर्णय झाल्यास रस्त्यावरील गोरगरिबांचा स्वस्तातील दोन वेळचा घास बंद होईल, अशी शक्यता आहे. यावरून महायुती सरकारवर टीका होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपर्क साधून शिवभोजन थाळी बंद करू नका, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची वाढलेली जवळीक चर्चेत आली आहे. यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असलेले छगन भजुबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.

काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्या या मैत्रीवर टोलेबाजी केली आहे. 'मी आज जाणार नाही, उद्या मात्र खात्री नाही', असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

शेतकरी प्रचंड अडचणीत, महायुती सरकार जबाबदार

महायुती सरकारने जाहीरनाम्यात तीन लाखांपर्यंत कर्ज माफ करू, अशी घोषणा केली होती. या घोषणेमुळे लोकांनी कर्ज भरले नाही. अशी फसवणूक सरकारने कशाला करायला पाहिजे? छाती ठोकून सांगितलं कर्ज माफ करू. पण तसे काहीच झाले नाही. या बजेटमध्ये सुद्धा ते काहीच देऊ शकणार नाही. पैसेच नाहीत. देणं एवढं आहे की, बस्स! दोन लाख कोटी रुपयांचे देणे आहे. लाडकी बहि‍णींचा अतिरीक्त खर्च आहे. देणार कोठून? मग घोषणा करत आहे. यातून शेतकऱ्यांच्या हाल होत आहे, त्याला सरकार जबाबदार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT