Prakash Ambedkar, Chhagan Bhujbal Sarkarnama
विदर्भ

Maratha Obc Reservation : जरांगेंना आव्हान देण्याची काय गरज होती ? आंबेडकरांनी भुजबळांना फटकारलं

Sachin Fulpagare

Maratha Reservation Issue in Maharashtra : जालन्यातील अंबडमध्ये ओबीसींचा महामेळावा झाला. या मेळाव्यात मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळांवर मोठा आरोप केला आहे. दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

जालन्यात झालेल्या ओबीसींच्या महामेळाव्यावर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. अकोल्यात जिल्हा परिषद कर्मचारी भवनमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून ओबीसी संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते.

आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी असा वाद रंगला आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न आहे. पण जिल्ह्याजिल्ह्यात बैठका घेऊन आम्ही हे षडयंत्र हाणून पाडू. आजच्या सभेत छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांना आव्हान देण्याची गरज काय होती? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

जरांगेंवरून प्रकाश आंबेडकरांचा राज ठाकरेंना टोला

आरक्षणावर भांडून काय साध्य होणार आहे. आपल्याला राज्यातच राहायचं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही समाजांना शांततेचं आवाहन केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यावरून राज ठाकरेंचा बोलविता धनी कोण? असा उलट प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT