Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Ayodhya Ram Mandir : बाबासाहेबांचा ‘तो’ दाखला देत सोहळ्यापासून आंबेडकर राहणार दूर

Sachin Deshpande

Vanchit Bahujan Agahdi : अयोध्येत 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या उपस्थितीत राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राम मंदिर ट्रस्टने सर्वच दिग्गज नेत्यांना आमंत्रित केले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना देखील आमंत्रण दिले गेले आहे. या नेत्यांनी ज्या प्रकारे 22 जानेवारी रोजीच्या मंदिर उद्घाटन सोहळ्यास उपस्थितीस नकार दिला. अगदी त्याच प्रकारे अयोध्येतील उद्घाटनाचे आमंत्रण आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोहळ्यास जाण्यास नकार दिला आहे.

आंबेडकर यांनी नकाराचे कारण सांगताना भाजपा व संघावर गंभीर आरोप केले आहेत. त्याच बरोबर नकाराचे कारण सांगताना देशाचे स्वातंत्र्य धोक्याबद्दल संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेली शंका अधोरेखित केली. अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या आमंत्रणाबद्दल आंबेडकर यांनी ट्रस्ट आभार मानले. लोकार्पण सोहळ्यात आपण सहभागी होणार नसल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

मंदिराचा संपूर्ण सोहळा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘हायजॅक’ केल्यामुळे या सोहळ्यास आपण अनुपस्थित राहत असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला. राम मंदिर उद्घाटन सोहळा हा एक धार्मिक कार्यक्रम आहे. तो निवडणूक जिंकण्यासाठीचे अस्त्र भाजपाने केल्याचा गंभीर आरोप ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखल देत आंबेडकर यांनी या सोहळ्याच्या वेळी अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्या प्रमाणे राजकीय पक्ष हे धर्माला उंचावर नेतील तर त्यावेळी देशाचे स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि यावेळी हे स्वातंत्र्य आपण नेहमीसाठी गमावू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेली भीती आज खरी होताना दिसत आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

धर्म आणि पंथाला देशाच्याही वर नेणारी भाजपा आणि आरएसएस त्यांच्या राजकीय फायद्यासाठी या सोहळ्याला ‘हायजॅक’ करत असल्याचा गंभीर आरोप आंबेडकर यांनी केला. जय फुले, जय सावित्री, जय शाहु, जय भीम म्हणत आंबेडकरांनी हे उत्तर दिले हे विशेष. त्यामुळे आंबेडकर हे अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT